बुधवार, १७ मार्च, २०२१

बाळ होण्यापूर्वी भाग-3

बाळ होण्या आधी १००% जबाबदारी घेण्याचे तंत्र शिका...!

दिवसभर नोकरी करून दमलेले आई-बाबा घरी आले. आल्याबरोबर साहिल त्याच्या मागण्या व गरजा घेऊन समोर आला. आणि चिडचिड करू लागला. त्याला पाहून साहिलचे बाबा पटकन बोलून गेले 'आम्ही तुझ्यासाठी एवढी मेहनत करतो आणि तुझ आपल रोजचच रडगाणं'



आता या वाक्याने आपल्याला आपले बालपण नक्कीच आठवले असेल. कितीतरी वेळा आपल्या कानावर असे वाक्य पडलेली आहेत "होय ना"...!

या सगळ्यातून वाद... वादातून तान- तणाव निर्माण होतात. आणि मग त्यातून काही गोष्टी टोकाला जाऊन जीवन विस्कळीत होते.


हे सर्व टाळण्यासाठी आपण आईबाबा होण्यास जबाबदार आहोत का? याचा विचार आधीच व्हायला हवा...!

असं म्हटलं जातं की आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. त्या प्रत्येकाच्या जीवनात असतातच परंतु आपण यशस्वी पालक तेव्हाच होतो जेव्हा आपल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडण्यासाठी सक्षम बनतो.

तर जबाबदाऱ्या कशा ?पूर्ण केल्या जातात...! आपल्या जीवनात जबाबदाऱ्या का? महत्त्वाच्या आहेत...! आणि आसे कोण कोणते? तंत्र आहे...! कि त्याच्या मदतीने आपण १००% जबाबदारी घेणारी व्यक्ती बनू शकता. हे तंत्र या ब्लॉग मध्ये तुम्हालाआज मिळणार आहे. त्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत वाचा...

जबाबदारी म्हणजे काय?


कोणत्याही प्रकारची तक्रार न करता आपण आपल्या पद्धतीने स्वतःमधील शक्तीचा वापर करून जीवन जगणे म्हणजे१००% जबाबदारी घेणे.

जेव्हा स्वतःला समजते की आपल्या जीवनामध्ये जे काही घडत आहे त्याचे कारण फक्त एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे आपण स्वतः 

बरोबर..?😊

तर जेव्हा आपल्या मनात ही समजदारी येते तेव्हा असे समजावे की आपण आता १००% जबाबदारी घेणारी व्यक्ती आहे. 

बरोबर?...😊

जर आपण जबाबदारी घेऊ इच्छित असाल तर सगळ्यात आधी आपल्या मनामध्ये आपल्याला हे पक्के करावे लागेल की... आपल्याला कोणतीही जबाबदारी घ्यायची असेल तर ती १००%च घ्यावी लागेल.

कारण फ्रेंड्स आपण किती दिवस दुसऱ्यांच्या तक्रारी करणार आहोत. आपल्या जीवनात तर असे कितीतरी लोक येतील आणि त्यांच्यापासून आपल्याला काही ना काही तरी झळ बसणार आहे. तर आपण आशा किती गोष्टी टाळू शकणार आहे, किती लोकांपासून दूर राहू शकणार आहे, किती लोकांना आपण बदलू शकणार आहे याचा कधी विचार केलाय?... 

 नाही ना..!

तर फ्रेंड्स आज पासून आपल्याला १००% जबाबदारी घ्यायची आहे. आज तुम्ही घेतलेला हा निर्णय यशस्वी पालकत्वासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला समजणे अतिशय गरजेचे आहे. याआधी कित्येक वेळा तुम्हाला कोणीतरी सांगितले असेल किंवा तुम्हाला माहितीही असेल की जबाबदारी घेणे किती महत्त्वाचे असते पण किती? लोक ती घेऊ शकतात...!

तुम्ही म्हणाल की आम्ही जबाबदारी घेतो किंवा घेतली आहे. पण फ्रेंड्स आपण कितीतरी वेळा कोणातरी विषयी नेहमी तक्रारी करत असतो. कुणाला ना कुणाला काही तरी सतत बोलत असतो... बरोबर ना...!

तर फ्रेंड्स आपल्या जीवनामध्ये कुठला ना कुठला तरी प्रॉब्लेम आहे. त्यासाठी आपण जर दुसऱ्याला जबाबदार ठरवत असेल तर याचा अर्थ आपण १००% जबाबदारी घेतलेली नाही. बरोबर ना?

चला तर मग पुढे जाऊया...

जबाबदरीचा एक शब्द आहे. तो असा कोणता? शब्द आहे की ज्यामुळे आपण सिद्ध करू की आपण जबाबदारी घेऊ शकत नाही. ती गोष्ट जर आपल्या मध्ये असेल तर याचा अर्थ असा की आपण जबाबदारी घेत नाही.

होय फ्रेंड्स...! आणि ही शब्दरूपी गोष्ट... खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे...

१.दोष देणे:

जेव्हा आपण दुसऱ्यांना नेहमी दोष देतो... म्हणजे: जेव्हा आपल्याला एखादा काहीतरी बोलतो तेव्हा आपण त्याला प्रत्युत्तर देतो, त्याच्यावर रागवतो व दुसऱ्या लोकांकडे त्याची तक्रार करतो. तर अशा प्रकारचा आपला स्वभाव असेल तर आपल्याला तो स्वभाव सोडावा लागेल. आपल्या मध्ये कोणत्याही गोष्टी संबंधी दोष देणारा स्वभाव असेल तर पालकत्वच काय तर आपण कोणत्याही गोष्टी मध्ये  आपल्या जीवनात पुढे जाऊ शकणार नाही.

फ्रेंड्स माझं मिशन असं आहे की बाळ होण्यापूर्वीच आपल्यामध्ये अगोदर बदल घडवून आणून... येत्या पाच वर्षात मला एक लाख गर्भवती मातांपर्यंत पोहचायचे आहे. त्यांच्या गर्भातील बाळावर संस्कार करायचे आहे आणि त्यांना देशाचे सर्वगुणसंपन्न व सक्षम असे देशाचे नागरिक घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे.

आज स्वतःला आपण विचारायचे आहे... की आपण कोण कोणत्या गोष्टीला, आपल्या शरीरातील कोणत्या भागाला, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, दोष देतो का? किंवा यापैकी कोण कोणत्या गोष्टींना जास्तीत जास्त दोष देतो...

हा स्वभाव प्रत्येकाचा असतो मी सुद्धा काही दिवसांपूर्वी स्वतःला व इतरांना दोष देत होते. मी सारखी आजारी पडते, माझे शरीर मला साथ देत नाही, मला टेक्निकल गोष्टी येत नाही. दुसरे मला समजून घेत नाही इत्यादी... परंतु मी माझ्या जीवनामध्ये बदल करून घेतला... तर तुम्ही तुमच्या जीवणामध्ये किती व कोणत्या गोष्टींना दोष देता हे कमेंट मध्ये लिहू शकता. जसे मी तुम्हाला इथे माझी कबुली दिली आहे. ओके...!

स्वतःबद्दल खरे सांगणे हे खूप चांगले असते. नाही तर तो व्यक्ती स्वतःची फसवणूक करतो. आपल्याला यातून बाहेर पडायचे असेल तर आपण आपली कबुली देणे अतिशय गरजेचे आहे. कारण आज मी तुम्हाला त्यावर एक सुंदर मार्ग सांगत आहे.

१) आपण जर दुसऱ्यांना व कोणत्याही गोष्टीला नेहमी दोष देत राहिलात, तक्रारी करत राहिलात तर ती गोष्ट आपल्याला यशस्वी होण्याला आडवी येते. पालकत्व निभावणे यामध्ये या गोष्टीचा खूप मोठा वाटा आहे.

उदा. आपल्याला एखाद्या रोड वरून जायचे आहे आणि त्या रोड वरती काटे किंवा मोठे दगड गोटे आहेत त्यामुळे आपला रस्ता आडला आहे तर आपण पुढे जाऊ शकणार का?... नाही..

बरोबर ना...?

जर आपल्यामध्ये सतत दुसऱ्यांना दोष देण्याची प्रवृत्ती असेल तर आजपासून ती आपल्याला सोडून द्यावी लागेल. प्रॉमिस करा की आज पासून मी स्वतःमध्ये बदल करून घेण्यास तयार आहे...!

"त्यासाठी आपल्याला घ्यावा लागेल खंबीर निर्णय"


फ्रेंड्स... 'आपण असे निर्णय कितीतरी वेळा घेतले आहेत आणि सोडून दिले आहेत'. पण आजचा निर्णय हा साधा निर्णय नसून अतिशय गंभीर निर्णय आहे. पूर्ण तयारीनिशी तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. जसा मी निर्णय घेतला आहे की मला येत्या पाच वर्षात १लाख महिलांच्या जीवनात बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचा आहे. त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक घडवायचे आहे. हा मी ध्यास घेतला आहे. त्यासाठी मी सातत्याने काम करत आहे. कारण मला तुमच्या मध्ये झालेला बदल आणि माझ्या हाताने घडलेले मुलं पाहण्यात खूप आनंद आहे . आणि तुम्हाला ही तुमच्या सुखी जीवनासाठी तुमच्या बाळाच्या भवितव्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा निर्णय बाळा होण्यापूर्वीच घ्यायचा आहे.

त्यासाठी आज आपली डायरी आणि पेन घेऊन आपल्या डायरीमध्ये आपले जीवन बदलण्यासाठी आपल्याला खूप चांगले चांगले निर्णय घ्यायचले आहे. ते तुम्ही लिहा. किंवा चार्ट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. 'पण याची मजा केव्हा येणार आहे जेव्हा ते तुम्ही पूर्ण कराल'😊. बोलण्यात आणि करण्यात खूप फरक आहे. मी जास्त विश्वास ठेवते कृती करण्यावर. तर आपल्यालाही आता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याच्या सवयी लावून घ्या. त्या सवयी कोणकोणत्या आहेत...

उदा. १)कष्ट करा: छोट्या कामाने हुरळून जाऊ नका..

माझे गुरु नेहमी म्हणतात. "अभी तो नापी है मोठी भर जमी अभी तो सारा आसमा बाकी है"सतत कष्ट करण्याची शायरी ठेवा.

२) स्वतःला किंमत द्या... आपण जर स्वतःला किंमत दिली तरच दुसरे आपल्याला किंमत देतात. या जगात जी व्यक्ती स्वतःला व्हॅल्यू देते तीच व्यक्ती खूप पुढे जाते आणि यशस्वी होते.

३) स्वीकार करा... तुम्ही जसे आहे तसा स्वतःचा स्वीकार करा. तसेच आपल्या कुटुंबामध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये, समाजामध्ये जी लोक तुम्हाला भेटतात त्यांचाही स्वीकार करा.

४) जिद्दी बना... कोणतेही काम पूर्ण चेे करण्याची जिद्द बाळगण्याची सवय लावा आपल्यामध्ये जिद्द असणे खूप महत्वाच्या आहे.

५) योग्य शिक्षण... तुम्हाला बाळ प्लॅनिंग करायचा आहे त्या अगोदर त्याबद्दल माहिती करून घेणे खूप गरजेचे असते. तुमचे उत्तम शिक्षण झालेले आहे असा विचार करून तुमचे पालक तुमच्याशी या विषयावर बोलत नाहीत कदाचित मुलींशी या विषयावर बोललं केले तिला समजावले जाते पण मुलांच्या बाबतीत तर हे प्रमाण अगदीच नगण्य आहे. हो की नाही?त्याला जरी गर्भधारणा होत नसली तरी गर्भधारणेत त्याचाही तितकाच वाटा असतो हा विचार केला जात नाही म्हणून बाळ होण्यापूर्वी आपण त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. त्यासाठी मातापित्यांनी डॉक्टरांकडे जाऊन समुपदेशन करून घ्यायलाा हवे .

सर्वात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक, अडचणी मानसिक ताणतणाव, आर्थिक अडचणी असताना शक्यतो बाळ प्लान करू नये आईवडील जेव्हा शरीर मनाने मुल होऊ देण्यासाठी तयार असतील तेव्हाच मुल होऊ देण्याचा विचार करावा. मूल हवं आहे... म्हणून मूल होऊ देणे हे अत्यंत चुकीचं आहे. तर त्या मुलाचं पालकत्व स्वीकारायला, त्याला एक उत्तम माणूस बनायला आपण तयार आहोत किंवा नाही हा विचार करणे अतिशय गरजेचे आहे त्यासाठी गर्भधारणा होण्याआधी किमान तीन महिने आधीपासून पती-पत्नीने सर्वांगीण विचार करावा.

मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा? वाटला माझे म्हणणे तुम्हाला पटले असेल... तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आजच "२१शतकातील गर्भसंस्कार" हा कोर्स जॉईन करा. कारण बाळ प्लॅन करण्याआधी तीन महिने हा कोर्स जॉईन करणे अतिशय महत्त्वाचे असते. अगदी सिस्टिमॅटिक पद्धतीने मी या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे .ज्या नैसर्गिक आणि दैवी गोष्टी आहेत... त्या मी या कोर्समध्ये सांगितल्या आहेत. त्यामुळे खुप लोकांना या कोर्सचा सकारात्मक आणि चांगला फायदा झाला आहे.

हा कोर्स तुम्हाला फक्त प्रेग्नेंसी साठीच नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्यात त्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे

सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे त्यामुळे आपले आरोग्यही चांगले राहणार आहे आणि आपल्याला मनासारखा बाळही मिळणार आहे. आणि मी प्रॉमिस करते की या कोर्समध्ये तुम्ही तुमचे पालकत्व निभावण्यासाठी सक्षम बनणार आहात.

सकारात्मक व आनंदी राहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून '२१ व्या शतकातील गर्भ संस्कार' हा फेसबुक ग्रुप जॉईन करा.

"२१ व्या शतकातील गर्भ संस्कार"

तुम्हाला जर या कोर्समध्ये सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच संपर्क साधा.

संपर्क:

https://wa.link/92aazl


तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे..

धन्यवाद...🙏🙂

४ टिप्पण्या:

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...