यशस्वी (आदर्श)माता बनण्याचे रहस्य:
मैत्रिणींनो तुमच्या मते यशाची व्याख्या काय आहे. यश? म्हणजे काय..!, ते? कधी मिळतं..!, ते? मिळण्यासाठी काय करायला हवं..! असे एक ना अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच अगदी लहानपणापासून पडत आले आहेत. होय ना? तुम्हाला तुमच्या बाळाच्या भवितव्यासाठी आणि तुम्ही एक आदर्श माता आहात याबद्दलचे तुमचं अस्तित्व जागांमध्ये निर्माण करण्यासाठीच.. रहस्य नेमकं? काय आहे..! हे जाणून घ्यायचं असेल तर हा ब्लॉग खरोखर शेवटपर्यंत वाचाच....
मैत्रिणींनो एक दुर्दैव अस आहे की जागातील 95 टक्क्याहून अधिक लोक या प्रश्नांचे उत्तर जाणून न घेताच मरून जातात…आणि ज्यांना उत्तर गवसतं ते मात्र जगावर राज्य करतात…!
एखादी कल्पना किंवा स्वप्न ठरवून त्याच्या पूर्ततेसाठी जेव्हा आपण आपलं तन-मन-धन झोकून देतो , आणि त्या कल्पनेवर कोणताही संशय न घेता शंभर टक्के विश्वास ठेवतो, कितीही अडचणी, अपयश आलं तरी त्याच मार्गाने पुढे जात राहतो, मग तिथे तुमचं ध्येय पूर्ण होवो अगर न होवो परंतु या प्रवासात तुम्ही तहान भूक विसरता ते खरं ''यश'
कोणताही काम करण्यासाठी जोश आणि उत्साह असणे खूप गरजेचे आहे आणि हा उत्साह व जोश आपल्याला मोटिव्हेशन मधून मिळतो. जर तुम्ही एखादं काम करण्यासाठी मोटिव्हेटेड असाल तर ते काम करताना तुम्ही 100% देता व मोटिव्हेशन नसेल. तर तुम्ही ते काम नीट करू शकणार नाही.
कुठेतरी माझ्या वाचण्यात आलं होत की एखाद्या कामाप्रती उदासीनता व निरुत्साह हा एक रोग आहे. आणि मोटीवेशन हे त्यावरचं एकमेव औषध आहे.
जेव्हा आपण अतिशय बिकट, प्रतिकूल परिस्थितीतून जात असतो आपल्यात उत्साह नसतो, त्यावेळी आपण हे मोटिव्हेशन च औषध घेतो. यासाठी आपण प्रेरणादायी असं वाचन करतो किंवा युट्युब, फेसबुक वरती मोटिव्हेशन चे व्हिडिओ बघतो बरोबर ना..?
मला आजपर्यंत बऱ्याच गरोदर मातांनी प्रश्न विचारला आहे की सतत मोटिव्हेट कसं राहायचं. स्वतःला सतत मोटीव्हेट कस ठेवायचं.? तर मग…
जाणून घ्या स्वतःला कायम मोटिव्हेट ठेवण्यासाठी पाच टिप्स:
१. तुम्ही तुमच्या टार्गेट पासून किती दूर आहात याचा रोज आढावा द्या:
तुम्हाला जे मिळवायच आहे, तुम्हाला जे बनायचं आहे,(आदर्श माता) त्या दृष्टीने रोज एक एक पाऊल पुढे जा. म्हणजे तुमच्या देण्यासाठी रोज थोडी थोडी मेहनत घ्या. माझे गुरु नेहमी म्हणतात की ध्येयाच्या दिशेने उडा, उत्तर येत नसेल तर धावा, धावता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर सरपटा, तेही जमत नसेल तर रेगाळा. पण रोज थोडं थोडं पुढे जा. आपल्याला दररोज एक टक्का तरी आपल्यामध्ये प्रगती करायचे आहे. आणि ती आदर्श माता आवडण्यासाठी त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्यामध्ये सकारात्मक बदल करायला हवा होय ना..! तुमच्यामध्ये बरेचसे बदल झाल्यानंतर तुम्ही तुमचं ध्येयाच छोटसं चित्र तुमच्या पाकीट मध्ये ठेवा. तुमच्या घरात देवपूजा असेल त्या ठिकाणी लावा. तुमच्या बेडरूम मध्ये तुम्ही बेडवरून उठल्याबरोबर दिसेल अशा ठिकाणी लावा. तुमच्या मोबाईल मध्ये वॉलपेपर वर ते ठेवा जेव्हा तुम्हाला निराशा येईल तेव्हा तो फोटो बघा. याने तुम्हाला प्रेरणा मिळेल व रोज तुमच्या ध्येयाच्या दिशेने तुम्ही सहज जाऊ शकाल.
२. महान आणि प्रेरणादायी व्यक्तींची आत्मचरित्र वाचा:
आपल्या देशात आपल्या जगात खूप मोठमोठ्या यशस्वी व्यक्ती होऊन गेल्या आहेत ज्यांचा आपल्यावर अजूनही प्रभाव आहे अशा व्यक्तींची आत्मचरित्र वाचा किंवा त्यांच्या आयुष्यावर आधारित असलेली पुस्तके वाचा. यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल त्यांचे कष्ट व मेहनत कळेल. आलेल्या अडचणी केलेल्या चुका त्यांनी दिलेली शिकवण हे सगळं काही शिकता येईल छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, स्टीव जोन्स यांसारख्या यशस्वी व्यक्तींकडून प्रेरणा घ्या.
३.प्रेरणादायी चित्रपट पहा किंवा प्रेरणा देईल असं संगीत ऐका:
४. फ्लॅशबँक मध्ये जाऊन तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या यशाबद्दल विचारा:
जेव्हा तुम्ही निराशेने, अपयशाने आस्वस्त असाल, स्वतःलाच खूप राग येत असेल तेव्हा फ्लॅशबँक मध्ये जाऊन तुम्ही आयुष्यात मिळवलेल्या यशाचा विचार करा. त्यावेळी जो आनंद तुम्ही अनुभवला होता तो पुन्हा अनुभवा, यामुळे काय होईल की तुमच्या आत नवीन ऊर्जेचा संचार होईल. तुम्ही पुन्हा एकदा एनर्जेटिक फील कराल व नवीन जोमाने कामाला लागाल. स्वतःला पुन्हा एकदा आठवण करून द्या की यश मिळवण्यासाठी तुम्ही किती मेहनत केली आहे, आशिच तर मेहनत तुम्हाला आता घ्यायची आहे. आणि ती घेतली तर तुम्ही नक्की यश मिळवू शकता.
या होत्या काही पद्धती, की ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वतःला कायम मोटिव्हेट ठेवू शकता. तुम्ही एखादं काम १००% मोटिव्हेशनने केलं तर तुम्हाला १००% यश हे मिळेलच.
तुम्ही? कधी ट्राफिक मध्ये अडकलाय का..! काय? होतं असं कुठेही अडकलं तर..! खूप राग येतो, चिडचिड होते. हळूहळू का होईना आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपण आनंदी होतो, समाधानी होतो. आपले वैयक्तिक आयुष्य असो , इतर नातेसंबंध, नोकरी असेल किंवा व्यवसाय करियर असो वा अध्यात्म. आपल्याला एकाच ठिकाणी अडकून राहायला आवडत नाही.
कोणतेही क्षेत्र असो, अगदी शालेय जीवनात सुद्धा आपल्याला कायम पुढे जायचं असतं. यशस्वी व्हायचा असतं. आणि आज तुम्ही ज्या स्टेजमध्ये आहात तर आत्ताही तुम्हाला तेच वाटत आहे. बरोबर? ना..!
पण तुम्हाला? माहिती आहे का..!की या यशस्वीतेचे तीन दुश्मन आहे. जे आपल्या यशाच्या रस्त्यावर स्पीड बेकर सारखे आडवे येतात. जर आपण यांना आपल्या रस्त्यातून, म्हणजेच आपल्या डोक्यातून, मनातून बाहेर काढून टाकलं तर मात्र आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही…!
चला तर मग या तीन शत्रू बाबत जाणून घेऊया….
१. लोक काय म्हणतील
मैत्रिणींनो मला माहिती आहे तुम्हाला लोक काय म्हणतील..
नवल परी आई झाली.. आम्हाला जसे पोरं झालेच नाही... आमच्या वेळी असं नव्हतं... आम्ही जसं असेल तसं धकून घ्यायचो... आता तर काय बाई यांचे चोचले... योगा काय करताय... रस्त्यावर काय फिरताय... सारखा डॉक्टर लागतोय... आजूबाजूच्या लोकांकडून तुम्हीच काय पण मी सुद्धा हे बोलणे ऐकलेले आहेत. पण तुम्हाला सांगते "सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग"..!
जेव्हा पासून मी स्वतः लोक काय म्हणतील हा विचार सोडून दिला तेव्हाच माझ्या जीवनात प्रगती झाली बर का. आणि ही म्हण तुम्हालाही ते सांगते.
एक हिंदी गाणं आहे,'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना..! त्यामुळे लोक काय म्हणतील हा विचार करणं बंद करा. लोक दुसऱ्यांना सल्ला देण्यात अगदी माहीर असतात. मी असं म्हणत नाही की तुम्ही कोणाच ऐकू नका, पण इतरांच ऐकताना स्वतःलाच मत मात्र विसरू नका. अपयशी माणसाकडून सल्ला घ्या आणि यशस्वी माणसाकडून अनुभव.
हा…
पण सरतेशेवटी तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. कृती करायला घाबरू नका. कृती कराल तरच अनुभव मिळतील. इच्छा असेल तरच चांगल्या गोष्टी शिकाल, शिकलात तरच यश येईल आणि यश आलं तरच आदर्श बनाल.
२ नशीबाला दोष देऊ नका:
मला एक सांगा पाऊस पडला नाही म्हणून शेतकर्याने स्वतःच्या नशिबाला दोष देत बसत शेती न करण्याचं ठरवलं तर, नशिब बदलून पाऊस पडेल का...??
नाही ना…
मग..
आपण हे मान्य केले पाहिजे की वेळ सारखी नसते, आज..
आज पासून दररोज एक एक दिवस आपल्यामध्ये चेंज होत जाणार आहे. प्रत्येक दिवशी आपला मूड बदलेल. परिस्थिती बदलेल. काही दिवसांनी अजून चांगलं होईल. आपण नशिबाला दोष देत न बसता आपल्या बाळाला आपल्या कडून जास्तीत जास्त बेस्ट देण्याचा प्रयत्न करत राहायचां आहे, आपले विचार चांगले ठेवायचे, चांगलं काम करत राहायचं, एक ते नऊ महिने या प्रेग्नेंसी काळातील आपल्या बाळासाठी आपण केलेले श्रम ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. जेव्हा ही वेळ बदलेल तेव्हा तुमची तयारी पूर्ण झालेले असेल आणि तुम्ही तुमच्या यशाची फळ खायला तयार झालेले असाल. मी कुठेतरी एक शायरी वाचली होती,
'हातो की लकीरो पे मत जा ये गालिब...
नाशिब तो उनके भी होते है...
जिनके हात नही होते' ll
३. Perfection (परिपूर्णता) च्या मागे धावणे:
तिसरी खूप महत्त्वाची गोष्ट…
तुमच्या मनातून ही गोष्ट काढून टाका, की जीवन परफेक्ट बनू शकत. प्रत्येकाला लगेचच त्याच्या मनासारखं एक आदर्श आयुष्य हव असतं, की जिथे सगळं व्यवस्थित मनासारखा असेल, पण ह्या गैरसमजुती ला मनातून काढून टाका. जीवनाला समजणे खूप अवघड आहे.
आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा थोड्याच अभी के अभी पूर्ण होतात. जीवन हे जखमांनी भरलेल आहे. पण वेळेला/काळाला मलम बनवा. मृत्यूशी हरायचच आहे एक दिवस.. पण त्यापूर्वी जीवनाशी जिंकायच देखील आहे.
यशस्वी व्हायच असेल तर in perfect action घ्यायला शिका. माझे गुरु नेहमी म्हणतात'आपल्या प्रवासात आपल्याला जे मिळतं ते यश नाही, तर आपण काय बनतो ते यश आहे. आणि या प्रेग्नेंसी काळात तुमच्या बाळाबरोबर तुम्ही सुद्धा घडणार आहात बनणार आहात. त्यामुळे काही मिळविण्यापेक्षा बनण्याकडे लक्ष द्या. गर्भसंस्कार हे फक्त नऊ महिन्यापुरतेच मर्यादित नसून ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यात फायद्याचे ठरतील. या मार्गाने चालल्यास तुम्ही तुमच्या बाळाचा योग्य मार्गदर्शक बंनाल यात शंका नाही. लवकरच तुमचे नाव आदर्श माता यादीत झलकल्याशिवाय राहणार नाही. याची मला खात्री आहेे. परंतु या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शनाची आणि तुम्हाला जर खरोखर या मार्गाने पुढे जायची इच्छा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून २१ व्या शतकातील गर्भसंस्कार हा फेसबूक ग्रुप नक्की जॉईन करा.
.माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा
धन्यवाद..!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा