शुक्रवार, २८ मे, २०२१

एपीजेनेटिक्स (अनुवंशिकता)आणि गर्भसंस्कार

गर्भाचां प्रत्येक अवयव तयार होत असताना तो गुणयुक्त तयार व्हावा यासाठी गर्भसंस्कार अतिशय महत्त्वाचा विषय आहे. स्त्री बीज पुरुष बीज आणि आत्मा या तींहीचा संगम म्हणजे गर्भ. विभाजन किंवा ज्यामुळे बाळा मधील चेतना जाणवते तो आत्मा. हा आत्मा येतो कुठून? असा प्रश्न तुमच्या मनामध्ये होय ना...!

आपण शाळेमध्ये हा प्रयोग नेहमी करायचो आणि घरी सुद्धा करायचं तो म्हणजे एक भिंत घेऊन उन्हामध्ये त्याखाली कागद करायचं सूर्यकिरणांमुळे कागद जाळायचा. सूर्यकिरण आपल्याला दिसत नाही पण कागद मात्र नक्की जवळ असतो मग हा कागद कसा जळतो त्या ठिकाणी सूर्यकिरण एकत्र आले आणि म्हणून कागद जळाला बरोबर ना..! अशाच प्रमाणे गर्भामध्ये आत्म्याचा प्रवेश होतो. तो आपल्याला दिसत नाही परंतु जाणवतो, कळतो. आणि आत्मा जेव्हा गर्भामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या गर्भाची वाढ व्हायला सुरुवात होते. सो स्त्रीबीज व पुरुषबीज आणि आत्मा यांचं कॉम्बिनेशन म्हणजे गर्भ हे आता आपल्याला समजलं असेलच.

मुलांची अनुवंशिकता (एपी जेनेटिक्स कोड) सारखे असेल आणि एक्सप्रेशन कोड वेगळे असेल तर त्याला संस्कार म्हणतात . सारख्याच बुद्धीची मुले असली तरी त्यांच्या गुणांमध्ये बदल असतो. गुणांमध्ये बदल करून पुढच्या पिढीसाठी आपल्याला त्यांच्यामध्ये चांगले एपिजनेटीक्स द्यायचे आहे. उदा. जुळी मुलं. एकाच आईच्या गुजरात जन्म घेतलेल्या मुल दिसायला सारखे असले तरी यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. असे का..

एकाचा ग्रास्पिंग पावर वेगळा, दुसऱ्याचा वेगळा. म्हणजे प्रत्येकाचा विचार वेगळा एपीजेनेटिक्स वेगळा. जो तो त्याच्या आधीच्या अनुवंशिकतेने नुसार गुण घेऊन जन्माला येतो. तर पुढील पिढीसाठी हे एपिजनेतिक अतिशय चांगल्या पद्धतीने तयार व्हावे ते कशामुळे साध्य होईल तर गर्भ संस्कारामुळे. गर्भातील बाळाला सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम होण्यासाठी त्या पद्धतीच्या ॲक्टिविटी गर्भ संस्कार मध्ये केल्या जातात. बाळ आधीची अनुवंशिकता घेऊन आलेले असल्यास तेसुद्धा गर्भात असताना बदलता येतात. जन्म होण्याआधीच आपल्याला गर्भावर संस्कार केल्यामुळे हे करणे शक्य होते.इथे मी तुम्हाला एक उदाहरण देते.

घरी पाळलेली कुत्री (राणी) ती प्रेग्नेंट असते. तिच्याबरोबर रानात राहणारी ही त्याच काळात प्रेग्नेंट असते. दोघी नाही थोड्या दिवसात पिलं होतात. राणीची पिलं अतिशय गरीब आणि प्रेमळ असतात व रानात राहणाऱ्या कुत्रीची पिल्लू अतिशय तिखट जवळ देखील येऊ देत नाहीत हे असं का? तर रानात राहणाऱ्या कुत्रीचा अम्यागोलांडा(भावना जागृत करणारा मेंदूचा एक भाग) हा अतिशय ॲक्टिव्ह कारण तिला संरक्षण नसल्यामुळे स्वतःचं संरक्षण स्वतः करायची तिला सवय असते त्यामुळे कोणी दिसलं की त्यावर हल्ला करायचा किंवा पळून जायचे तिला एवढेच माहिती असते मग ही गर्भात असताना तेच संस्कार पडतात म्हणून फार तिखट असतात कोणी दिसलं तर त्याच्यावर हल्ला करायचा किंवा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पळून जायचं हे रानातल्या कुत्र्याच्या बाळाला शिकवावं लागत नाही. त्याउलट घरी राहणाऱ्या राणी कुत्रीचे जास्त प्रमाणात लाड होत असल्यामुळे तिला जास्त प्रेम मिळत असल्यामुळे तिची पिल्लंही तशीच बनतात. म्हणून येता जाताना माणसांना चाटणे मांडीवर बसणे लाड हे राणीच्या बाळाला शिकवावे लागत नाही. का शिकवावं लागत नाही तर ते आईच्या पोटामध्ये असताना शिकलेले असतात. रानातल्या कुत्रीचा amigolada अति जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असल्यामुळे तिचे बाळ आहे तसेच बनले आणि घरच्या कुत्रीचा आम्ही आम्ही amigolada एकदम लेस ऍक्टिव्ह आहे. याचा अर्थ आईच्या संवेदना बाळ सूचना म्हणून पाळत व वातावरण आणि संस्काराचा परिणाम. तुमच्या लक्षात आलंच असेल की मला काय म्हणायचं आहे.



न्यूरॉन्सच्या जोडण्या होऊन, इलेक्ट्रिक वायरींगप्रमाणे किंवा कॉम्प्युटरप्रमाणे, मेंदूमध्ये आणि शरीरात, कोट्यावधी न्यूरॉन्सची असंख्य सर्किट बनलेली असतात. या सर्किटां पासूनच आपली मज्जासंस्था तयार झाली आहे.तिच्या मधून मेंदूत व शरीरात दरक्षणी हजारो संदेशांचे वहन चालू असते.आपण जे विचार करतो, कृती करतो, जे बोलतो , जे अनुभवतो, आपल्याला जे जे जाणवते, त्या प्रत्येक गोष्टीसाठी ही सर्किटस् जबाबदार असतात.  'संवेदना वाहक' सर्किट आपल्या मेंदूतील संवेदना ग्रहण करणाऱ्या तंतूंद्वारे येणारे सिग्नल मेंदूपर्यंत पोचवतात.  'आज्ञावाहक' सर्किट मार्फत आपल्या स्नायूंना आज्ञा दिली जाते. मेंदूच्या उच्च-स्तरीय क्रिया, जसे स्मृती, निर्णयक्षमता आणि आपल्या सभोवतालच्या जगाचे आकलन, यासाठी जटील आणि अत्यंत किचकट अशी सर्किट आवश्यक असतात.


जन्मापूर्वी, गर्भाशयात असतानाच, 'जीन्स' म्हणजे, 'गुणसूत्रां'च्या निर्देशानुसार साधी सर्किट्स् निर्माण होतात. गुणसूत्रे म्हणजे जीन्स. पण हे सारे 100% जीन्सवर अवलंबून असते असे मुळीच नाही. एपीजेनेटिक्स शास्त्राच्या मदतीने आता जीन्सवर मात करायला मनुष्य शिकू लागला आहे. जीन्स किंवा एपिजेनेटिक्स यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळत नसला तरी,गुणसूत्रांच्या सदृश कार्यपद्धती असणाऱ्या 'बीज-अवयव' अशासारख्या शब्दांचे उल्लेख आयुर्वेदामध्ये सापडतात.  हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने सांगितलेली 'गर्भिणीपरिचर्या' हा एपीजेनेटिक्सचाच युक्तीने केलेला प्रयोग आहे.

जेव्हा आपले न्यूरॉन्स आणि त्यांची कनेक्शन्स म्हणजे त्यांच्या जोडण्या, नवीन अनुभव आणि वातावरणानुसार बदलत जातात, तेव्हा ही सुरुवातीला साधी आणि गुंतागुंत नसणारी सर्किट्स बरीच क्लीष्ट व किचकट बनत जातात.  हे बदल मुख्यत: गर्भावस्थेत व बालपणातच घडतात, परंतु ते संपूर्ण आयुष्यभर काही प्रमाणात सुरू राहतात. 


आपल्या मेंदूतील बहुतेक न्यूरॉन्स गर्भावस्थेतच तयार होतात व जन्माच्या वेळी हजर असतात. त्यापैकी बहुतेक सर्वच आपल्या उर्वरित आयुष्यात टिकून राहतात. म्हणूनच मेंदूच्या विकासासाठी गर्भावस्थेचा आणि जन्मानंतर सुरुवातीचा (सूतिकेचा) कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो.

एखादे नवीन कौशल्य किंवा भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत मेंदू, 'न्यूरॉन्सची कनेक्शनस्', मजबूत करत असतो.  अगदी नवीन कनेक्शन्स निर्माण देखील करतो. प्रत्येक नवीन अनुभव व अनुभवाची पुनरावृत्ती, मेंदूमध्ये बदल घडवतो, आकार देतो.विशेषतः गर्भावस्थेत व जन्मानंतर अगदी सुरुवातीच्या काळात(मातेच्या सूतिकावस्थेत).  त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती ही इतर सर्वांपेक्षा 'वेगळी', आणि 'एकमेवाद्वितीय' अशी असते.


गर्भसंस्कारांचे महत्त्व स्पष्ट करणारे एक फार सुंदर वाक्य इथे नमूद करावेसे वाटते.

"जन्मापूर्वी, 'अनुभव' मेंदूला जसा आकार देतात. तसा, जन्मानंतर, मेंदू अनुभवांना वळण देण्यास समर्थ होतो."


गर्भामध्ये, मेंदूच्या विकासादरम्यान, न्यूरॉन्सची भरमसाट, अशी, आवश्यकतेपेक्षा कितीतरी जास्त वाढ होते. पण लवकरच, मेंदू त्या अतिरिक्त पेशी काढून टाकतो. मेंदूच्या कार्यकारीत्वासाठी आवश्यक असलेली आणि वारंवार वापरली जाणारी कनेक्शनस् टिकून रहातात. वापरात नसलेले न्यूरॉन्स आपोआपच नष्ट होतात. या प्रक्रियेला 'प्रुनींग' (pruning) असे म्हणतात. गर्भाच्या मेंदूमधली अधिकाधिक कनेक्शनस् टिकवणे आणि वाढवणे हे गर्भसंस्कारांच्या मार्फत साध्य केले जाऊ शकते. बाळाच्या मेंदूला आईच्या माध्यमातून बौद्धिक आणि मानसिक व्यायाम दिले जातात व मेंदूला निरोगी ठेवून त्यांचा जास्तीत जास्त विकास साधला जातो.  बाळाला जन्मानंतर आयुष्यभर याचा शिदोरी म्हणून उपयोग होतो.






बुधवार, २६ मे, २०२१

मेंदूतील चेतापेशी (न्यूरॉन) चे कार्य

 

तुम्हाला? माहिती आहे का   गर्भाशयातील गर्भाचााचााचा मेंदू व्यवस्थित तयार व्हायला पाहिजे असेल तर मेंदूमधील पेशींची सुव्यवस्थित संरचना होणे आवश्यक आहे.

गर्भाचा मेंदू तयार होत असताना त्यामध्ये थोड्याशा चुका झाल्या किंवा काही गोंधळ झाला तर त्याचे दुष्परिणाम जन्माला येणार्‍या व्यक्तीला आयुष्यभर भोगावे लागतात. त्यासाठी चेतापेशी म्हणजेच न्यूरॉन काय आहेत व त्याचे कार्य कसे चालते हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. न्यूरॉन्स कार्यपद्धती आणि मेंदूचा विकास याविषयी आपल्याला जितकी माहिती असेल तितके गर्भसंस्कार नेमके कसे करतात याची तुम्हाला स्पष्टता येईल आता तुमच्या मनात याबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली असेल होय ना..! आणि खरंच जर कसे असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
नमस्कार...!
मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच. "२१व्या शतकातील गर्भसंस्कार "या प्लॅटफॉर्मची संस्थापिका मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवती माता न पर्यंत पोहचून त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आणायचा आहे. त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करून त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे.
मेंदूच्या पेशी शरीरातील इतर पेशींपेक्षा वेगळ्या  वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या असतात. या पेशींना मेंदूपेशी, चेतापेशी किंवा न्यूरॉन असे म्हणतात.मज्जातंतू चे आवेग आयोजित करण्यासाठी असलेला एक खास सेल म्हणजे चेतापेशी (न्यूरॉन)
मेंदूमध्ये लक्षावधी पेशी असतात. बाहेरून संदेश वाहून आणण्यासाठी व आतील संदेश बाहेर वाहून नेण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या धाग्यांचे विद्युत मार्ग असतात. तसेच मेंदूच्या निरनिराळया भागांमध्ये ज्याचे त्याचे काम ठरलेले असते. संदेश वाहून नेणाऱ्या या मार्गात किंवा विशिष्ट भागात कधीकधी बिघाड होऊ शकतो.उदा.विषबाधा झालेले अन्नपदार्थ तसेच कीटकनाशके यांचा परिणाम झाल्यामुळे संदेश वाहनाची गती कमी होऊ शकते.असे झाले तर त्या त्या कामात अडथळा येतो किंवा पूर्णपणे ते काम बंदही होऊ शकते.श्वसनासारख्या कामांमध्ये अडथळा आला तर मृत्यूदेखील येऊ शकतो.असे आदेश पाठवण्याचे काम विशिष्ट चेतातंतूंमार्फत होते. संदेश मेंदूकडे आणण्यासाठी आणि मेंदूकडून आज्ञा परत अवयवांकडे पाठवण्यासाठी वेगवेगळे चेतातंतू असतात.हे संदेशवहनाचे काम सूक्ष्म विद्युतशक्तीने केले जाते. या नसांचे जाळे रक्तवाहिन्यांप्रमाणेच शरीरभर पसरलेले असते. काही नसा केवळ मेंदूकडे संदेश,नेणा-या तंतूंच्या असतात. याउलट काही नसांमध्ये संदेश नेणा-या आणि आणणा-या अशा दोन्ही तंतूंचा समावेश असतो.


पेशींचा मुख्य भाग बॉडी मधून निघणाऱ्या एका लांब तंतू च्या टोकापासून झाडांच्या मुळा प्रमाणे त्याला अनेक तंतू निघतात. या तंतूची टोके एकमेकांच्या जवळ जवळ येतात. त्यामुळे पेशी (न्यूरॉन)ची साखळी तयार होते. व या साखळीच्या जोडण्या एकमेकांवर जोडल्या जाऊन चेता पेशींचे जाळे तयार होते. आणि ज्यावेळी तंतूंची टोके जवळ जवळ येतात तेव्हा मात्र ती एकमेकांना चिकटलेली नसतात. त्यांच्यामध्ये एक बारीक फट असते या फटीमध्ये रसायने पाझतात. आणि त्यांनाच संदेश वाहक म्हणतात. या संदेशवहक फटीमध्ये पाझरलेल्या रसायनांना मानसिक आरोग्य व मानसिक आजारांमध्ये खूप महत्त्व आहे.
मन भावना इच्छा भीती व राग या सर्व अंतर्गत क्रियांवर नियंत्रण करण्यासाठी एक स्वतंत्र चेता व्यवस्था असते या व्यवस्थेला आंतरिक चेता व्यवस्था म्हणतात आणि ही व्यवस्था सुद्धा मेंदूच्या नियंत्रणाखाली असते.उदा. अचानक आपल्या डोळ्यासमोर धोकादायक अशी परिस्थिती निर्माण होते की त्यामुळे आपल्या डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते. त्यावेळी आपले डोळे पटकन झाकले जातात व त्या धोक्यापासून म्हणजे डोळ्यांना इजा होण्यापासून डोळे वाचतात. आपल्या डोळ्यासमोर काय आहे की त्यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होणार आहे ते आपल्याला माहिती नसताना देखील पटकन ही क्रिया घडते आणि मग आपल्याला आश्चर्य वाटते. हा प्रसंग आपल्या सगळ्यांनाच नेहमी येतो. म्हणजेच आपले शरीर ,इंद्रिये हे मेंदूच्या कंट्रोल मध्ये आहे. ह्या क्रिया व्हायला काही सेकंद पुरे असतात.
न्यूरॉन (चेतापेशीं )चे जाळे योग्य पद्धतीने तयार होण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत हे महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन व उपाययोजना करणे ही गर्भसंस्कार करणाऱ्या मार्गदर्शकाची जबाबदारी आहे.
(ब्रेन पॉवर) मेंदूची ताकद वाढण्यासाठी माईंड काही माईंड सिक्रेट्स आहेत. आजपर्यंत आपल्याला या विषयावर कुठेही शिकवले गेले नाही. पण हे शिकून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. गर्भसंस्कार या कोर्समध्ये मी तुमच्याशी अशा गोष्टी शेअर करणार आहे की त्या गोष्टी पूर्वीचे लोक फॉलो करत असायचे. जे आजकालचे लोक फॉलो करत नाही. या कोर्समध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्यामुळे तुमची संपूर्ण विचारसरणी बदलेल. आणि ते सिक्रेट आहे सुपर ब्रेन पावर सिक्रेट.

आपल्याला आल्या बॉडीवर नाही तर आपल्या ब्रेन वर काम करायचे आहे. आणि आपण आपल्या ब्रेन वर काम केलं तर आपला ब्रेन अतिशय पावरफुल बनेल, शार्प बनेल आणि आपण स्वतः तंदुरुस्त हेल्दी व ताजेतवाने बनल्यामुळे सहाजिकच आपले बाळही त्या प्रकारचेच बनेल यात शंका नाही. तर मग त्यासाठी आपल्या ब्रेनला काय हव आहे. व त्यासाठी काय करावे लागेल की ज्यामुळे तो तंदुरुस्त हेल्दी व ताजातवाना राहील आणि त्यामुळे आपले बाळ हे अतिशय पावरफुल शार्प आणि बुद्धिमान बनेल. याचे सिक्रेट तुम्हाला "२१ व्या शतकातील गर्भ संस्कार" या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे. त्यासाठी या कोर्स मध्ये नक्की सहभागी व्हा.

चहूबाजूला covid-19 मुळे नकारात्मकता पसरली आहे. तुमच्यासारख्या कितेक मातांना या नकारात्मकतेच्या विळख्यातून बाहेर काढून सकरात्मक व आनंदी राहण्यासाठी तसेच बाळाच्या उज्वल भविष्यासाठी '२१ व्या शतकातील गर्भसंस्कार' हा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फेसबुक ग्रुप जॉईन करा.

 २१ व्या शतकातील गर्भसंस्कार

 अधिक माहितीसाठी संपर्क:

 गर्भसंस्कार मार्गदर्शक अलका शिंदे

तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ओळखीतल्या गर्भवती मातांना जरूर शेअर करा तसेच आपल्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या

धन्यवाद..!


शनिवार, २२ मे, २०२१

सोशल मीडियाचा गर्भावस्थेत बाळाच्या मेंदूवर परिणाम होऊ नये म्हणून कशी काळजी कशी घ्याल

आजकाल प्रत्येकाच्या जीवनामध्ये सोशल मीडिया हा अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. परंतु गर्भावस्थेमध्ये आपल्या व आपल्या बाळावर सोशल मीडियाचा काय परिणाम होतो हे आपण जाणून घेणे खूप गरजेचे आहे आणि हा परिणाम सकारात्मक/नकारात्मक यापैकी कोणत्या प्रकारचा आहे व या सोशल मीडियाचा आपण कशा प्रकारे वापर करायला पाहिजे की ते आपल्या येणाऱ्या बाळासाठी उपयोगी असेल तुम्ही प्रेग्नेंट असाल आणि तुमच्याही मनामध्ये हात प्रश्न नेहमी येत असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा
नमस्कार..! मी अलका शिंदे...
गर्भसंस्कारकार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच २१ व्या शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवतींच्या जीवणामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायच्या आहे आणि हा माझा ध्यास आहे.

सोशल मीडिया? टाळायला पाहिजे का..!

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे की त्यामार्फत आपण सर्व जगा सी कनेक्ट राहू शकतो. एका ठिकाणी राहून आपण सर्व जगासी जोडले जातो. जगामध्ये कुठे काय चालले आहे कुठे काय नवीन होत आहे ही सर्व सविस्तर माहिती सोशल मीडिया मार्फत आपल्यापर्यंत पोहोचते. तसेच नवीन नवीन फ्रेंड बनविण्यासाठी आपले फॅमिली मेंबर नातेवाईक यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठी तसेच नवीन नवीन नॉलेज मिळविण्यासाठी सोशल मीडिया हे माध्यम अत्यंत उपयोगी आहे परंतु त्यामार्फत नकारात्मक गोष्टीही तितक्याच सविस्तरपणे आपल्या पर्यंत पोहचतात हेही तितकेच खरे आहे. सोशल मीडियाचा गैरवापर न करता त्यामधून नेमके काय घ्यावे आणि काय सोडून द्यावे हे आपल्याच हातात असते. यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की मला काय म्हणायचे आहे.

सोशल मीडियाचा प्रेग्नन्सी सी संबंध

देशाचे भवितव्य सुसंस्कृत पिढीवर अवलंबून असते. पवित्र संस्कार, सुदृढ शरीर, सर्वगुणसंपन्न बालक हीच खरी देशाची संपत्ती आहे. आणि आशा संपत्तीची भविष्यात देशाला अत्यंत गरज आहे बाळाच्या संस्काराचा पाया हा मातेच्या गर्भामध्ये घातला जातो. त्यासाठी उत्तम व सर्वगुणसंपन्न बाळ हवे असणारे इच्छुक पालक असणे फार गरजेचे आहे. तरच ते पालक आपल्या बालकाचे भवितव्य घडविण्यासाठी सदैव तत्पर राहतील व आपल्या बालकावर संस्कार होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान ग्रहण करून आपला परिवार,देश व समाज कल्याणासाठी एक महान व्यक्तिमत्व निर्माण करतील. त्यासाठी पालकांना ज्ञानार्जनासाठी सोशल मीडिया हे माध्यम अतिशय फायद्याचे व उपयोगी ठरणारे आहे. पण त्याबरोबरच त्याचा प्रतिकूल परिणाम होईल असा गैरवापर केल्यास त्याचे दुष्परिणाम नक्कीच पाहायला मिळेल हेही तितकेच खरे आहे.

सोशल मिडीया चा दुष्परिणाम

फोन,इंटरनेट, टीव्ही लॅपटॉप, या साधनांच्या अतिवापराने व्यक्तीच्या शरीरावर व मनावर कळत नकळत परिणाम होतो. कारण त्यामध्ये काही रेडिएशन्स, लाईट इफेक्ट असतात. गर्भवती मातेने या साधनांचा अति वापर केल्यास त्याचा परिणाम तिच्या ब्रेनवर व विकासावर देखील होतो. अर्थातच तिच्या बाळावरही त्याचा परिणाम होतोच. कारण त्यामुळे झोप होत नाही. मूड खराब होतो. चिडचिड होते राग येतो छोट्या छोट्या गोष्टी मुळे नाराजी येणे म्हणजेच सहन शक्ती कमी होते.  फोन स्क्रीन मधून ब्ल्यू लाईट निघते ती आपल्या डोळ्यात मार्फत मेंदूवर परिणाम करते त्यासाठी मोबाईलचा वापर झोपण्यापूर्वी एक ते दोन तास बंद ठेवावा. व ब्राईटनेस कमी असावा. तसेच सकाळी उठल्याबरोबर एक तास मोबाईल हातात घेऊ नये. कारण सकाळच्या वेळेत आपला ब्रेन सतर्क असतो बॉडी रिलॅक्स होते आणि अशा वेळेला आपण लाईटच्या संपर्कात आल्यास बॉडीला चांगले सिग्नल मिळत नाही.

गर्भवती मातेने या काळामध्ये चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे निसर्गासोबत जोडले गेले पाहिजे. मोकळ्या हवेत फिरले पाहिजे. व्यायाम प्राणायाम या क्रिया केल्या पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी तिच्या शरीराला आतून उपचार करतात. व सकारात्मक व्हायब्रेशन्स निर्माण करतात. जे बाळावर सकारात्मक परिणाम करतात.

गर्भवतीने जर सोशल मीडिया पासून थोडेसे लांब राहिले तर तिचा वेळ वाचेल व या सर्व गोष्टी करण्यासाठी तिला वेळ मिळेल.

नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे जर खरोखर मातेला मनातून वाटत असेल तर तिने जरूर प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यावा. सोशल मीडियावर तासन्तास बसल्याने शरीरामध्ये दुखणे तयार होते. वजन वाढते. हाता पायावर सूज येते. त्यामुळे सिझेरियन करण्याची वेळ येते.

नकारात्मक गोष्टींचा ब्रेनवर परिणाम

नकारात्मक गोष्टींचा ब्रेन वर होणारा परिणाम त्यापाठीमागे कारण आहे. जेव्हा आपण एखादी निगेटिव बातमी ऐकतो किंवा एखादं निगेटिव दृश्य पाहतो, एखाद्या गोष्टीवर नकारात्मक विचार करतो, एखाद्यावर पटकन रिॲक्ट होतो. किंवा एखाद्या गोष्टीचा स्वतःला त्रास करून घेतो त्या वेळेला आपल्य शरीरामध्ये त्याच प्रकारचे भितदायक हार्मोन्स निर्माण होतात.

उदाहरणार्थ. प्रेग्नेंट आहात आणि आपल्या अगदी जवळच्या नातेसंबंधातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर त्यावेळेला आपली? ॲक्शन कशी असेल..!  आपण? तेव्हा आपली महत्त्वाची कामे करत रहाल की त्या परिस्थितीमध्ये सामील व्हाल..! तर तुम्ही नक्कीच त्या परिस्थितीमध्ये सामील व्हाल. अशा वेळेला काय होतं किती या परिस्थितीचा आपल्या ब्रेन वरती नकारात्मक परिणाम होतो म्हणजे त्यावेळेला आपल्या ब्रेन पर्यंत सिग्नल जातो की ही गोष्ट खराब आहे आणि मग आपला ब्रेन त्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतो. व महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून आपण दुर्लक्षित होतो. मनामध्ये भीती निर्माण होते.

भीतीमुळे कुणाकुणाला भूक कमी लागते. तर कुणाला जास्त भूक लागते. काहींना युरीन जास्त होते. काहींना युरीन कमी होते. अशा परिस्थितीमध्ये काहींचा बी. पी. वाढतो काहीना हार्ट अटॅक येऊ शकतो. काहीना पॅरेलेस होतो. परिणामी गर्भवती  मातेचे शरीर अन बॅलेन्स होते.

गर्भ आईच्या प्लेसेंटा मार्फत सर्व गोष्टी ग्रहण करत असतो. तिच्या शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोन्स निर्माण होतात. हे हार्मोन्स रक्तात गर्दी करतात व त्याचा थेट परिणाम बाळावर होतो.

आपल्या जीवनामध्ये थोडाफार ताण-तणाव नैसर्गिक असतो. आणि त्यापासून वाचण्यासाठी निसर्गाने आपल्या शरीरांमध्ये तशी तरतूद करून ठेवलेली आहे. त्या विरुद्ध लढण्याइतकी प्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये असते. बाळ व आई यांच्यामध्ये नाळ जोडलेली आहे. त्यामार्फत रक्त शुद्ध करून बाळापर्यंत पोहोचविले जाते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

जेव्हा अशा नैसर्गिक प्रक्रियांच्या पलीकडे जाऊन. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊन त्याची लेव्हल वाढली तर नैसर्गिक प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये काम करत नाही. त्यावेळी या सर्व गोष्टी बाळावर परिणाम करतात. जशा निगेटिव गोष्टींचा बाळावर परिणाम होतो. तसाच पॉझिटिव गोष्टींचाही बाळावर तितकाच परिणाम होतो.

उदाहरणार्थ. प्रेरणा तिच्या प्रेग्नेंसी मध्ये डान्स क्लास घेत असे .क्लास ची मुले निघून गेल्यानंतर ती थोडावेळ शांत झाली की तिला आत मधे बाळ खूप उड्या मारत आहे असे जाणवत असे एक दिवस ती डॉक्टरांकडे गेली व सोनोग्राफी केली तेव्हा सोनोग्राफीमध्ये बाळ अक्षरशा: डान्स करताना डॉक्टरांनी तिला दाखवले. याचा अर्थ असा की आई ज्या वेळी सकारात्मक गोष्टी पाहते त्यावेळी ती आनंदी असते. आई आनंदी असेल तर बाळ ही आतून तसाच प्रतिसाद देते. अशावेळी बाळाची ऐकण्याची व प्रतिसाद देण्याची ताकत वाढते.

तिसऱ्या महिन्यापासून पुढे प्रत्येक गर्भवतीने आपल्या बाळाशी कनेक्ट राहून त्याला सकारात्मक एनर्जी दिली पाहिजे. सोशल मीडियावर ज्या ज्या गोष्टी आपल्या बाळासाठी योग्य आहे त्या पाहून झाल्यावर त्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ॲक्शन घेतली पाहिजे फक्त बघून काही होत नाही त्यासाठी ॲक्शन घेणे खूप महत्त्वाचे असते.

निगेटिव्ह गोष्टी टाळून चांगले ऐका चांगले बघा. मेडिटेशन करा प्राणायाम करा व्यायाम करा चांगली चांगली पुस्तके वाचा चांगले चांगले ऑडिओ बुक ऐका.

पुस्तक वाचण्याची सवय लावून घ्या पुस्तक वाचल्याने कल्पना शक्ती वाढते आणि त्यामुळे आपल्या भावना जागृत होऊन आपण आपल्या बाळाशी पटकन कनेक्ट होतो व आपल्याला त्या पुस्तकातून जेव्हा चांगला अनुभव येईल त्यावेळी चांगले हार्मोन्स बाळा पर्यंत पोहोचायला मदत होईल. आणि त्याची एक चांगली पर्सनॅलिटी बनेल.

गर्भावस्थेमध्ये आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टींची माहिती मिळण्साठी सोशल मीडियाचा जरूर वापर करा परंतु इतकाही वेळ त्यामध्ये घालवू नका की आपण महत्त्वाच्या कामात पासून दूर जाऊ. आपल्या गर्भावस्थेत ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या ऍक्टिव्हिटी करण्याची गरज आहे त्यापासून दूर जाऊ या गोष्टीचे भान ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

अशाप्रकारे गर्भावस्थेपासून वयाच्या पाच वर्षापर्यंतचा काळ बाळाच्या मेंदूसाठी अक्षरशा सुवर्णकाळ असतो मुलांचा मेंदू एखाद्या स्पंज प्रमाणे सर्व गोष्टी टिपत असतो त्यामुळे या काळामध्ये आपण कटाक्षाने वर दिलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आपली त्याला मदत होईल.

आपल्या गर्भातील बाळा च्या सुसंस्कारबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी माझा २१व्या शतकातील गर्भसंस्कार हा फेसबुक ग्रुप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा.

२१ व्या शतकातील गर्भ संस्कार

अधिक माहितीसाठी संपर्क;

 गर्भसंस्कार मार्गदर्शक अलका शिंदे

तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या. तसेच नवीन लग्न झालेल्या बाळ प्लॅनिंग करत असलेल्या मुली व गर्भवती माता आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ब्लॉग शेयर करायला विसरु नका.

धन्यवाद..!

शुक्रवार, २१ मे, २०२१

जाणिवेचे मेंदू शास्त्र


तुम्हाला? माहिती आहे का?की गर्भाच्या  शरीरातील  कार्य करणारया सर्व यंत्रणा विकसित झालेल्या असतात आणि तो अक्षरशः, व्यवस्थित जीवन जगणारा  फक्त आकाराने लहान असणारा एक 'मनुष्य' असतो. हे एक जाणीवेतील मेंदू शास्त्र आहे. तुम्हालाही जाणून घ्यायची नक्की इच्छा झाली असेल होय ना..!

तर मग हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे . त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

नमस्कार 🙏अलका शिंदे..

गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच २१ व्या शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवतींच्या जीवणामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळावर सुसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे..!

अकाली प्रसूती होऊनही जीवंत राहू शकलेले जगातील  सर्वात लहान मुल, हे आठरा आठवड्यांचे अकाली जन्मलेले मूल आहे. (म्हणजे गर्भावस्थेचे फक्त साडेचार महिने झाले असतानाच जन्माला आलेले). पाचव्या महिन्यापासून पुढे अकालीप्रसूतीने जन्माला आलेली बालके, प्रगत देशांमध्ये जगवली जाऊ शकतात. अर्थात अशा अपरिपक्व अवस्थेत झालेल्या जन्मामुळे बालकांचे होणारे शारीरिक व मानसिक नुकसान, पूर्णपणे टाळता येणे शक्य नसते. 

अशा अकाली प्रसूती होण्यामागच्या,माता आणि गर्भ यांच्याशी निगडीत, मानसिक आणि शारीरिक कारणांना आधीपासूनच चार हात दूर ठेवणे आणि निर्माण झालेल्या कारणांचे संभाव्य दुष्परिणाम टाळणे  हे गर्भसंस्कार उपक्रमाचे महत्त्वाचे अंग आहे

गर्भातील संवेदना

गर्भाशयातील साडेचार महिन्यांचे बाळ गर्भाशयातील पाण्यात (गर्भोदक किंवा अम्नीओटिक फ्लूइड) मिसळलेल्या गोड, आंबट किंवा तीखट चवीच्या पदार्थांना, चेहर्‍याचे हावभाव बदलून प्रतिसाद देते, पसंती किंवा नापसंती दर्शवते असे अनेक प्रयोगांमध्ये संशोधकांना आढळले आहे. 

पाचव्या महिन्यात , गर्भिणी माता आनंदी, प्रसन्न झाली की बाळ लाथ झाडून आणि विशिष्ट पद्धतीने अंग वळवून खुशी व्यक्त करते. साधारण ५ व्या महिन्यापासून, गर्भाच्या  गर्भाशयातील दिनचर्येमध्ये, • क्रियाशील असण्याचा काही काळ, • तंद्रीसारख्या, आळसावलेल्या अवस्थेतील काळ (period of drowsiness) आणि • झोपेचा काळ असे वेगवेगळे कालावधी असतात. झोपेच्या विशिष्ट सवयी आणि जाग-झोपेचे ठरावीक वेळापत्रक सुद्धा असते. 

न्यूयॉर्कमधील 'अल्बर्ट आइन्स्टाईन मेडिकल कॉलेज'चे डॉ. डॉमिनिक  यांच्या मते, सातव्या महिन्याच्या शेवटी मेंदूच्या सुनिश्चित अशा जीवनाची सुरूवात होते. पुढे आयुष्यभर मेंदूला साधारण त्याच विशिष्ट जीवनशैलीचे अनुसरण करणे सोयीचे आणि सोपे जाते.

झोपेत डोळ्यांच्या पापण्या बंद असताना, अनेकदा बुबुळांची हालचाल होत असते. या हालचालीवरुन झोपेचे दोन प्रकार केले आहेत. REM झोप आणि NREM झोप. यापैकी REM झोप ही, स्वप्न पडत असल्याची द्योतक आहे.

मेंदूचे शास्त्र

माणूस कोणताही अनुभव घेतो, त्या वेळी त्याच्या मेंदूतील ठरावीक न्युरॉन्स (मज्जातंतू) विद्युतधारा निर्माण करतात आणि ते एकमेकांना जोडले जातात. गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यापर्यंत,बाळाच्या 'ईईजी' (Electro-encephalogram) (मेंदूमधील विद्युतवहनाचा आलेख) च्या सहाय्याने, बाळ झोपले आहे की जागृत आहे हे ओळखता येते. एवढेच नव्हे तर आरईएम झोप (जी स्वप्नांची सूचक आहे) आणि एन.आरईएम झोप (स्वप्नरहित गाढ झोप) यामधला फरक देखील ओळखला जाऊ शकतो. 

"जन्मानंतरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, मूल बहुतेक वेळा झोपते आणि या काळात, स्वप्नयुक्त झोपेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८० ℅ असते. झोपेचे आणि त्याबरोबर स्वप्नांचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते.  प्रौढ होईपर्यंत एकूण झोपेच्या केवळ २०% झोप स्वप्नयुक्त असते.

स्वप्ने ही मेंदू,( म्हणजेच मनसुद्धा ) कार्यरत असल्याची निदर्शक आहेत. आणि कोणतेही स्वप्न ही जागृतावस्थेतील अनुभवांचीच पुनरावृत्ती असते. त्यामुळे गर्भाला पडणारी स्वप्ने, ही त्याच्या जागृतावस्थेतील अनुभवांशी संलग्नच असली पाहिजेत असे अनुमान करण्यास काहीच प्रत्यवाय नाही. गर्भसंस्कारांमार्फत गर्भाला जे सकारात्मक 'अनुभव' दिले जातात, त्यांचीच स्वप्नाद्वारे उजळणी होत असली पाहिजे. गर्भावस्थेत गर्भाला येणारे नकारात्मक आणि अनिष्ट अनुभव गर्भावर कायमस्वरूपी ठसा पाडतात यात आश्चर्य वाटायला नको. असे श्री रोग तज्ञ डॉक्टर नरेंद्र लेले यांनी स्पष्ट केले आहे.

गर्भात असताना बालकाच्या मनावर नकारात्मक विचारांचे ठसे उमटल्यामुळे त्याचा बाळाच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होईल याची जाणीव प्रत्येक आई-वडिलांना असावी.

आपल्या व आपल्या बाळाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून जीवनात हव्या त्या गोष्टी, सुखी आनंदी व समाधानी जीवन कोणाला नको आहे. आपले व आपल्या बाळाचे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व सर्वांनाच हवे आहे.

चहूबाजूला covid-19 मुळे नकारात्मकता पसरली आहे. तुमच्यासारख्या कितेक मातांना या नकारात्मकतेच्या विळख्यातून बाहेर काढून सकरात्मक व आनंदी राहण्यासाठी तसेच बाळाच्या उज्वल भविष्यासाठी 'मी २१ व्या शतकातील गर्भसंस्कार' या लाईव्हवर्कशॉप ची सुरुवात केली आहे तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व फेसबुक ग्रुप जॉईन करा.

२१ व्या शतकातील गर्भ संस्कार

अधिक माहितीसाठी संपर्क

गर्भसंस्कार मार्गदर्शक अलका शिंदे

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा धन्यवाद ..!

सोमवार, १७ मे, २०२१

गर्भातच बाळाच्या मेंदूचा विकास



स्वीटी च्या आईने वर्गात आणून सोडले कि ती खूप घाबरायची. तिची बसण्याची जागा एक ठराविक आसायची. डोळे छोटे व एक डोळा नाकाच्या जवळच्या खोबनित तर दुसरा डोळा कानाच्या बाजूने वळलेला रंगाने गोरीपान शरीराने सडपातळ केस विस्कटलेले  मतिमंद असल्यामुळे ती एकलकोंडी झाली होती. मुलांमध्ये मिसळत नसायची गाणे गोष्टी इतर ऍक्टिव्हिटी करायला सांगितल्या की अजिबात रिस्पॉन्स देत नसायची. भैय्या व नेहा या दोघांचीही अशीच परिस्थिती अंगणवाडी क्षेत्रामध्ये काम करत असताना २१ वर्षात मला अशा कितीतरी मुलांचे अनुभव आले आहेत कितीतरी मुलं बघायला मिळाली आहेत.हे कशामुळे होते याचा आपण कधी विचार केला? वारंवार सूचना देऊनही गर्भवती माता आपल्या बाळाबद्दल म्हणावं तशा जागरूक नाहीत गर्भसंस्कार याबद्दल अजूनही फारशी जाणीव नाही मूल जन्माला येण्यापूर्वी त्याची नीट काळजी घेतली जात नाही  बाळाच्या मेंदूवर बाळ गर्भात असतानाच प्रोग्रामिंग होत असते आणि तेही एकदाच होते. 

तुम्हाला? माहिती आहे का..!आई बाळाशी जेव्हा संवाद करते तेव्हा मेंदूच्या पेशी एकमेकांसोबत जुळतात तसेच मेंदूच्या पेशी ऍक्टिव्ह बनतात आणि त्यामुळेच बाळाच्या मेंदूचा ८०%टक्के विकास हा गर्भात असतानाच होतो हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाल आहे. ते कसे याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा..

नमस्कार मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच..
२१ व्या शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवतींच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे.

१९६६ मध्ये डॉ. सॅलाम आणि डॉ. अ‍ॅडम्स या शास्रज्ञांनी हे सिद्ध केले की  प्रथम न्यूरॉनचा (मज्जातंतू) पेशीसमूह हा, 'मायलीन' अस्तित्वात येण्यापूर्वी कार्य करण्यास सुरवात करतो.  खरंच, या संशोधनानुसार, गर्भधारणेच्या पाचव्या आठवड्यांपूर्वीच प्रतिक्षिप्त क्रियांची एक आश्चर्यकारक जटिल मालिका दिसू लागते. यावेळी, गर्भाच्या त्वचेला उत्तेजित केले असता डोके, धड आणि हातापायांच्या मंद, नमुनेदार हालचाली होत असल्याचे निदर्शनास येते. गर्भधारणा झाल्यापासून पहिल्या महिन्यानंतर गर्भ एका सेकंदाला मेंदूच्या आठ हजार पेशी तयार करतो. इतक्या जलद गतीने गर्भात मेंदूच्या पेशी विकसित होतात. या पेशींचे काही दिवसातच मेंदूत रूपांतर होते. त्यानंतर जसजसे दिवस पुढे जातील तस तशा अधिक जलद गतीने पेशींचा समूह जुळू लागतो. आणि मेंदूच्या या पेशी काही दिवसातच आपल्या जागेपासून थोड्या वरच्या दिशेने जातात. जर या पेशी आपल्या नवीन जागेवर वरती चढण्यास समर्थ ठरल्या नाही, म्हणजेच त्या कमकुवत राहिल्या तर बाळाला बौद्धिक आजार होण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी गर्भवतीने गर्भधारणा राहिल्यापासून पुढे एक महिन्यातच गर्भाला पोषक अनुकूल असे वातावरण देणे गरजेचे आहे.

आश्चर्यजनक हालचाली

नवव्या आणि बाराव्या आठवड्यादरम्यान बाळ, लाथ मारणे, पाय फिरविणे यांच्याबरोबर बोटांच्या वलयाकार हालचाली करत  असल्याचे दिसून येते. एवढा छोटा गर्भ, चेहऱ्यावर नापसंती दर्शक हावभाव दाखवतो, तोंड उघडतो, ओठांना मुडपून तोंड मिटून घेतो. पापण्यांना हलका स्पर्श केला तर बाळ आता, पूर्वीसारखे शरीराला हिसके देत नाही, तर पापण्यांच्या फटीतून ते हळूच बघू लागते. असे संशोधकांचे निरीक्षण आहे. ओठांवर टिचकी मारावी तशासारख्या हलक्या स्पर्शाला, ओठांच्या चोखल्याप्रमाणे होणाऱ्या हालचालींनी प्रतिसाद दिला जातो. आठव्या आठवड्यापासून बाळ स्वतःचा अंगठा चोखत असतेच. या सगळ्या हालचाली अतिशय आश्चर्यकारक आहेत. आणि बाळाच्या मानसिक प्रगल्भतेच्या निदर्शक आहेत.

प्राथमिक अवस्थेतील, रिकामी फुफ्फुसे, जन्मानंतर कराव्या लागणाऱ्या श्वासोच्छ्वासाचा, जणू पूर्वाभ्यास करत असल्यासारखी, विस्तारण्यास आणि संकुचित होण्यास सुरुवात करतात. 

गर्भसंस्कारला उत्तम प्रतिसाद

तिसर्‍या महिन्याच्या अखेरीस बाळाची लांबी अंदाजे ७.५ से. मी. असते.. आणि त्याचे वजन १४ ग्रॅम असते.  'तीन महिने' एवढ्या कमी वयाचे गर्भाशयस्थ मुल, वैयक्तिक स्वभाव वैशिष्ट्ये दर्शविण्यास सुरुवात करते. विशेषत: त्याच्या चेहर्‍यावरील हावभाव. ही निरक्षणे खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहेत.आपण समजतो त्यापेक्षा गर्भाशयातील बाळ कित्येक पटींनी अधिक विकसित असते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक.. सर्वच दृष्टीने. अर्थातच ते अतिशय संस्कारक्षम आहे. गर्भसंस्कारांना ते उत्तम प्रतिसाद देते. आणि त्यांचा होणारा परिणाम त्याच्या वर आयुष्यभरासाठी प्रभाव टाकतो.

नुकत्याच वर्णन केलेल्या सर्व हालचाली करण्यास आणि प्रतिक्रियां देण्यास सक्षम असलेल्या गर्भामध्ये काही प्रमाणात तरी मानसिक प्रक्रिया होत नसेल, किंवा स्वतःबद्दल आणि निकटच्या वातावरणाबद्दल काहीच जागरूकता नसेल, असे म्हणणे हे माझ्या मते मूर्खपणाचेच ठरेल."( डॉ.थॉमस वेर्नी.) व असा डॉक्टर नरेंद्र लेले यांनी उल्लेख केलेला आहे.

अनुभव हा मेंदूचा शिल्पकार

मेंदू हा त्याला मिळणाऱ्या अनुभवांना पूर्ण आयुष्यभर संवेदनशील असतो.पण संवेदनशीलतेच्या बाबतीत गर्भावस्थेचा काळ व जन्मानंतरचा प्रारंभिक कालावधी अधिक निर्णायक असतो. या काळातच मुख्यतः मेंदूची वाढ, जडणघडण आणि विकास होत असतो. 

गर्भावस्थेमध्ये असताना मिळणाऱ्या सांवेदनिक(सेंसिवल) जैविक (बायोलॉजिकल) हॉर्मोनल रासायनिक(केमिकल) मानसिक इ. अनुभवांमुळे मेंदूची योग्य बांधणी झाली तर जन्मानंतर,त्याला येणाऱ्या अनुभवांना योग्य वळण लावण्यास मेंदू सक्षम होतो.

गर्भस्थ बाळाच्या संपूर्ण जीवनाचे नियोजन स्वभाव स्वास्थ्य सौभाग्य व्यक्तिमत्व आजच निश्चित करा. आपल्या बाळाचे सौभाग्य स्वतःच्या हाताने लिहिण्याचा एक अनुभव सिद्ध व अद्भुत विधी म्हणजे '२१ व्या शतकातील गर्भ संस्कार' या कोर्समध्ये आपले स्वागत आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून "२१ व्या शतकातील गर्भ संस्कार" हा फेसबुक ग्रुप जॉईन करा.

"२१ व्या शतकातील गर्भ संस्कार"

अधिक माहितीसाठी संपर्क

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा धन्यवाद ..!

शनिवार, १५ मे, २०२१

माता पिता आणि बाळ यांच्यामधील परस्पर संवाद आणि मानसिक देवाण-घेवाण

तुम्हालाा? माहिती आहे का...? की बाळाचा व्यक्तिमत्वविकास जन्माआधीच सुरू होतो. ही आता सर्व जगाने मान्य  केलेली वस्तुस्थिती आहेे. याबद्दलचेे काही सिक्रेट्स आहेत.ते जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. त्यासाााठी ब्लॉक शेवटपर्यंत वाचा. 

नमस्कार मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच..
 २१ व्या शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवतींच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचा आहे आणि हा माझा ध्यास आहे.

संशोधन दर्शविते की गर्भवती माता, गर्भाचा पिता, आणि गर्भ, यांच्या मध्ये होणाऱ्या परस्परसंवादामुळे आणि विचार व भावनांच्या देवाणघेवाणीमुळे, गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या शरीरावर व मनावर, चांगले किंवा वाईट परिणाम होतात. बाळाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण जन्माला येण्यापूर्वीच होऊ लागते. मग ती सकारात्मक होईल किंवा नकारात्मक.

बाळाचा व्यक्तिमत्त्व विकास जन्माआधीच सुरु होतो ही आता सर्व जगाने मान्य केलेली वस्तुस्थिती आहे..याप्रकारच्या संशोधनामुळे गर्भसंस्कार करणे अत्यंत गरजेचे आहे याबद्दल शंकेला जागाच राहिलेली नाही.आणि साऱ्या जगभर आता 'गर्भसंस्कार' नावाने किंवा 'प्रीनेटल पॅरेंटिंग' या नावाने गर्भाशयातील गर्भाच्या व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग सुरू झाले आहेत.

तान तणावाचा परिणाम


डॉ. सॉन्टाग,यांना असे आढळले की आईच्या भावनिक तणावामुळे गर्भाच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ होते; जर हा तणाव बराच काळ कायम राहिला तर गर्भाचे वजन कमी झालेले दिसून येते. त्यांनी पुढे असेही निदर्शनास आणून दिले की तीव्र भावनिक ताणतणाव असणाऱ्या मातांमध्ये जन्मलेली मुले अतिक्रियाशील (हायपर ऍक्टीव्ह) चंचल, चिडचिडी, स्क्वर्व्हिंग (सतत चुळबूळ करणारी, अस्वस्थ), रडणारी (किरकिरी) असतात. 

काही संशोधकांना असा विश्वास आहे की मुलांना लहानपणी लवकर होणाऱ्या ऑटिझमच्या सिंड्रोमचे (आत्ममग्नता) ( syndrome of early infantile autism)  मूळ गरोदरपणाच्या काळातल्या तिच्या आईला असणाऱ्या तीव्र चिंतेत होते. (ऑटिझम व लहान मुलांमध्ये होणाऱ्या त्यासारख्या इतर काही आजारांची माहिती पुढे येणार आहे)

डॉ.फेरेरा लिहितात: "... हे उघड झाले आहे की आईच्या, नकारात्मक भावना, कधीकधी, गर्भाच्या नाशासाठी  कारणीभूत होतात.(वंध्यत्व, गर्भपात, मृतजन्म, नवजात मृत्यू इत्यादीं प्रकारांनी ). पण प्रत्येक वेळी अशा भावना गर्भाच्या नाशास कारणीभूत ठरतातच असे नाही. तरीपण त्याच्या सामान्य विकासात काही ना काही व्यत्यय मात्र नक्कीच आणतात आणि जन्मजात विकृती किंवा अधिक सूक्ष्म किंवा कमी स्पष्ट स्वरुपाच्या, सहजपणे लक्षात न येणाऱ्या इतर विकृतींना जबाबदार ठरतात."

मानसिकतेचा परिणाम

गर्भधारणा आणि प्रसूती दरम्यान दोन हजार स्रियांचा अभ्यास  करून डॉ, ल्युकेश हे अशा निष्कर्षाप्रत पोचले की 'मातेचा गर्भाविषयी असणारा दृष्टिकोन' हा अन्य कोणत्याही कारणाच्या निरपेक्ष गर्भावर विलक्षण परिणाम करणारा सर्वात जास्त प्रभावी घटक आहे.

या संशोधनादरम्यान, अभ्यासासाठी निवडलेल्या सर्व गर्भिणी या एकाच आर्थिक स्तरातील होत्या, बुद्धिमत्ता आणि शिक्षणाच्या बाबतीत देखील समकक्ष होत्या. आणि सर्वांची गर्भावस्थेतील घेतली गेलेली काळजी समान दर्जाची आणि गुणवत्तेची होती. भिन्न असणारा एकमेव महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे, जन्मणाऱ्या मुलाबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन; आणि त्याचा त्यांच्या मुलांवर गंभीर परिणाम झालेला दिसून आला. 

सकारात्मकतेचा परिणाम

 गर्भावस्थेचा आनंदाने स्वीकार करणाऱ्या आणि गर्भाच्या स्वागतासाठी उत्सुक असणाऱ्या स्री- पुरुषांची मुले ही गर्भावस्थेला मनातून अस्वीकार करणाऱ्या किंवा मनाविरुद्ध गर्भधारणा झालेल्या स्रीयांच्या मुलांपेक्षा, प्रेग्नंसीच्या काळात, प्रसूतीदरम्यान आणि जन्मानंतरही भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वस्थ व निरोगी राहिली.

असा उल्लेख डॉक्टर नरेंद्र यांनी त्यांच्या लेखात केला आहे.

वैज्ञानिक दृष्ट्या गर्भामध्ये बाळाच्या मेंदूचा विकास ८०% होतो असं सिद्ध झाला आहे थायलंड येथील डॉक्टरांनी जन्मपूर्व अवस्थेतील बालकावर प्रयोग केले व सदर च्या प्रयोगात पालकांचा गर्भातील बाळाची वेगवेगळ्या ज्ञानेंद्रिया मार्फत संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला त्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की सदरची मुले ही जन्मानंतर आईवडिलांची अधिक जवळ असतात व ते लवकर बोलतात ती लवकर हसू लागतात त्या डॉक्टरांनी यावर दोन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत काही शास्त्रज्ञांनी कितीतरी गर्भसंस् कारा नंतरच्या मुलांवर प्रयोग केले असता असे आढळले आहे की मुलांच्या बुद्धिमत्तेची स्मरणशक्ती व इंद्रिय सुसंगती मध्ये लक्षणीय प्रगती आढळली या सर्व गोष्टींचा विचार करून गर्भावर संस्कार करण्यासाठी आपण जरी उत्सुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माझ्याशी संपर्क साधा...

आपल्या प्रेग्नन्सी काळामध्ये सकारात्मक व आनंदी राहण्यासाठी.... 

२१ व्या शतकातील गर्भ संस्कार हा फेसबुक ग्रुप जॉईन करा.

"२१ व्या शतकातील गर्भसंस्कार"

अधिक माहितीसाठी संपर्क

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा धन्यवाद ..!


शुक्रवार, १४ मे, २०२१

आई आणि गर्भाच्या दरम्यान असलेलं कुंपण :प्लेसेंटा (वार)

तुम्हाला?  हे माहिती आहे का..! की जरी शरीरात इतर अनेक असे अवयव आहेत ज्याशिवाय आपण जगू शकत नाही, परंतु प्लॅसेंटा हा एकमेव अवयव असा आहे जो कार्य पूर्ण झाल्यावर नैसर्गिकरित्या  काढून टाकला जातो.

परंतु गर्भधारणेमध्ये प्लेसेंटा (वार) हा अवयव किती महत्त्वाचा आहे आणि त्याचे कार्य काय आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. 

नमस्कार..🙏 मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच...

"२१ व्या शतकातील गर्भसंस्कार" या प्लॅटफॉर्मची संस्थापिका पाच वर्षात एक लाख गर्भवती मातांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे..

प्रत्येक गर्भधारणेत त्या बाळाला उत्तम प्रकारे आधार देण्यासाठी नवीन प्लेसेंटा तयार होते.

गर्भावस्थेमध्ये प्लेसेंटा किंवा वार हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे बाराव्या आठवड्यापासून गर्भाच्या पोषणाची संपूर्ण जबाबदारी या प्लेसेंटा वर येते. प्लेसेंटा विषयी थोडक्यात माहिती पाहू.

प्लेसेंटा हा गर्भधारणेदरम्यान बनलेला एक तात्पुरता अंतःस्रावी अवयव आहे, जो निरोगी गर्भधारणेची देखभाल करतो व प्रसूतीच्या आणि स्तनपान करण्याच्या तयारीत महत्त्वपूर्ण हार्मोन्स तयार करतो.

गर्भशयातले गर्भाचे वातावरण या प्लेसेंटावर बऱ्याच अंशी अवलंबून असते.


नवीन संशोधनात आढळून आले आहे की या प्लेसेंटा निर्मितीसाठी आई-वडिलांनपैकी वडिलांचे जीन्स मुख्यतः जबाबदार असतात गर्भसंस्कारउपक्रमाअंतर्गत विचार करताना गर्भधारणेपूर्वी पतीचे शुक्रजंतू निरोगी आणि सक्षम असावेत यासाठी देखील प्रयत्न केले जातात.

त्यामुळे गर्भ धारणा ही चुकून झालेली किंवा नकळत झालेली असू नये तर ती नियोजन बद्ध गर्भ धारणा असावी असे गर्भसंस्कार विषयी बोलताना नेहमी सांगितले जाते. याचाच अर्थ गर्भसंस्काराची सुरुवात गर्भधारणा झाल्यानंतर न होता ती गर्भधारणा होऊ द्यायचं ठरवल्यापासूनच  होते किंवा झाली पाहिजे.

प्लेसेंटामधील रक्तवाहिन्या गर्भाकडे ऑक्सिजन आणि पोषक घटक आणतात आणि गर्भाच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकतात. हे वहन नाळेमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्यांमधून होते.  गर्भासाठी आईचे ऑक्सिजनयुक्त रक्त प्लेसेंटामध्ये आणले जाते. त्यातील ऑक्सिजन व इतर पोषक द्रव्ये, हॉर्मोन्स इत्यादी प्लॅसेंटाद्वारा गाळून गर्भाच्या रक्तात पाठवली जातात. तर गर्भाकडून डीऑक्सीजेनेटेड (ज्यामधला ऑक्सिजन वापरला गेला आहे असे, ) गर्भाचे रक्त, नाळेमधल्या दुसऱ्या रक्त वाहिनीतून परत प्लेसेंटाकडे पाठवले जाते. त्यामधला कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर टाकाऊ द्रव्ये गर्भापासून ते आईकडे परत जातात, यामुळे गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधीत गर्भाची वाढ आणि विकास होऊ शकतो.

महत्त्वाचे म्हणजे आई व गर्भाचे रक्त एकमेकात कधीच मिसळत नाहीत. त्यामुळेच आईचा व बाळाचा रक्तगट (ब्लडगृप) वेगवेगळा असला तरी सामान्य परिस्थितीत दोघांचेही काही बिघडत नाही. (आकृती पहा)

अँन्टीबॉडीज (रोगप्रतिकारक द्रव्ये) देखील आईकडून गर्भाकडे जाऊ शकतात, ज्यामुळे काही रोगांपासून संरक्षण मिळते. हा फायदा जन्मानंतर कित्येक महिने टिकू शकतो..

प्लेसेंटामध्ये रक्तवाहिन्यांचे एक जटिल नेटवर्क असते जे आई आणि विकसनशील गर्भाच्या दरम्यान पोषक द्रव्ये आणि वायूंची ये जा करण्यास सहाय्य करते.

प्लेसेंटाचे  कार्य 

बाळाला ऑक्सिजन पुरवण्यासाठी बाळाच्या फुफ्फुसांसारखे कार्य , दूषित घटक काढून टाकण्यासाठी मूत्रपिंडाचे (किडनी),  पोषण करणे हे पचनसंस्थेचे कार्य, आणि अँटीबॉडी पुरवून रोगप्रतिकारक यंत्रणा म्हणून कार्य, हॉर्मोन्स निर्माण करणे हे अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य.. व इतरही अनेक कार्ये.

आईच्या रक्तातल्या काही हानिकारक पदार्थांना गर्भाच्या शरीरात जाण्यास अटकाव केला जातो. प्लॅसेंटा एखाद्या गाळणी प्रमाणे काम करतो व गर्भाला कोणतीही हानी होण्यापासून वाचवतो. तथापि, तो गर्भाला जात असलेले सगळेच हानिकारक पदार्थ वगळू शकत नाही. उदाहरणार्थ, अल्कोहोल (दारू मधला नशाकारक पदार्थ) ,अनेक प्रकारची औषधे व रसायने प्लॅसेंटाचा अडथळा ओलांडू शकतात

गर्भधारणेदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण हार्मोन्स तयार करतो. हे हार्मोन्स, प्लेसेंटा आणि गर्भाची वाढ व विकास नियंत्रित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात. गरोदरपण टिकून रहाण्यासाठी हे हॉर्मोन्स अतिशय आवश्यक असतात आणि बाळाच्या जन्माची तयारी करण्यासाठी आईवर कार्य करतात.

गर्भाच्या पेशी प्लॅसेंटामधून आईच्या शरीरात पाठवल्या जातात असे नवीन संशोधनात आढळले आहे. आईच्या त्वचा, किडनी, यकृत, अस्थिमज्जा इ. ठिकाणी या बाळाच्या पेशी सापडतात.

जखमी किंवा रोगग्रस्त अवयवामध्ये जाऊन या पेशी तो अवयव दुरूस्त करून व्याधी निवारण्यास मदत करतात

गर्भधारणा होण्याआधी किंवा गर्भधारणा झाल्यानंतर देखील या सर्व माहितीची मातेला गरज आहे तुम्हाला जर याव्यतिरिक्त आणखी माहिती मिळवायचे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा...

तुमच्या प्रेग्नन्सी काळामध्ये सकारात्मक व आनंदी राहण्यासाठी २१ व्या शतकातील गर्भसंस्कार हा ग्रुप खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नक्की जॉईन करा

https://www.facebook.com/groups/562863397763173/?ref=share

 अधिक माहितीसाठी संपर्क

https://wa.link/92aazl

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा

धन्यवाद...!

गुरुवार, १३ मे, २०२१

कसा होतो गर्भातील बाळाचा विकास

एक ते नऊ महिन्यात ची संपूर्ण गर्भयात्रा

तुम्हाला? हे माहिती आहे का? की गर्भाशयातील बाळाचे आयुष्य कसे असते आणि आपण ते कसे शोधू शकू ? गर्भातील बाळाचा विकास होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे प्रत्येक आई-वडिलांना उत्सुकता असते की माझे बाळ गर्भामध्ये कसे असेल, काय करीत असेल, झोपले असेल की जागे असेल, की ऐकत असेल  तुम्हाला या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे तर शेवटपर्यंत वाचा...

नमस्कार🙏 मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच..! 

२१ शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवतींच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल करून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे...!

चला तर मग जाणून घेऊया

१- ९ महिने गर्भातील बाळाचा विकास:

१ला महिना:


स्त्रीची मासिक पाळी चुकल्यावर तिच्या लक्षात येतं की ती गर्भवती आहे.बाळ एका पाण्याने भरलेल्या पिशवीमध्ये असते. सुरुवातीला ते पाण्याच्या बुडबुड्या सारखे असते. पहिला महिना संपून दुसरा महिना लागला की बाळ गव्हाच्या दाण्याप्रमाणे दिसू लागते. १४ व्या दिवसापासून बाळाच्या मेंदूतीच्या पेसी प्रत्येक मिनिटाला २.५लाख इतक्या झपाट्याने विकसित होतात. तिसऱ्या आठवड्यामध्ये हाडे, स्नायू व आतील भाग तयार होऊ लागतो.२२व्या दिवसापासून स्नायुमय पेशींनी बनलेल्या हृदयाची धडधड सुरू होते. पहिल्या महिन्यांमध्ये माता गर्भवती आहे की नाही हे तिला नीट समजले नसले तरी जेव्हा ती बाळ प्लानचा विचार करते तेव्हापासूनच खरी गर्भसंस्कारला सुरुवात होते.तेव्हापासूनच चांगला विचार करा, चांगली पुस्तके वाचा, सकारात्मक वातावरणात राहायला सुरुवात करा.

बाहेरचे अन्न खाणे बंद करून घरी बनवलेले शुद्ध व सात्विक आहार घ्यावा.

या काळात वात, शरीर, मन व भावनांमध्ये छोटे छोटे बदल व्हायला सुरुवात होते. कधीकधी थकवा जाणवतो. कधी घाबरल्यासारखे होते. अशा वेळी स्वतःला घरच्या कामांमध्ये व्यस्त ठेवा. घरातील मोठ्या व  अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेत रहा व चिंतामुक्त रहा. या काळातच गर्भसंस्कार घेतला तर तुम्ही या गोष्टींपासून दूर राहून आपला प्रेग्नन्सी प्रवास आनंदी घालवाल.

बाळाची लांबी 0.6 सें मी.असते. या वेळा मध्ये बाळाचे वजन व लांबी जास्त प्रमाणात वाढते.


२ रा महिना

या महिन्यात बाळाचे छोटे छोटे हात पाय बनायला सुरुवात होते. व बाकीच्या अवयवांचा ही विकास व्हायला सुरुवात होते.श्रवण (ऐकणे)ची शक्ती विकसित व्हायला सुरुवात होते. व  दृष्टी इंद्रिये त्यांचा विकास होऊ लागतो परंतु डोळे बंद असतात. चेहऱ्यावरील सर्व अवयव बनायला सुरुवात होते. मेंदूसोबत पेशीचा संबंध व्हायला सुरुवात होते. नाळ बनते. हात पाय बनतात व त्यावर नखे यायला सुरुवात होते. आमाशय, यकृत, गुदद्वार या अवयवांचा विकास व्हायला लागतो. या महिन्यात बाळाची लांबी ३ आणि वजन २८ ग्राम इतकी होते.

या महिन्यात गर्भवती मातेने पुढे झुकने, जास्त वेळ उभं राहून काम करणे, पाय लटकते ठेवणे अशा गोष्टी टाळाव्यात.

ह्या महिन्यात मळमळ, उलटी, डेकर, छातीत जळजळ होणे, तोंडाला चव नसणे, मानसिक ताण तणाव, चिडचिड ,राग, आळस इत्यादी लक्षणे दिसून येतात.

या काळात पती व घरातील सर्व मंडळींनी गर्भवती मातेला सहकार्य करावे.

या महिन्यात गर्भवती मातेने प्रवास करू नये, जड सामान उचलू नये, व जादा कसरतीची काम करू नये.

खजूर, अंजीर, किसमिस, द्राक्षे, सुकामेवा, दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा.

प्रार्थना व गर्भ संवाद  यासारखी ऍक्टिव्हिटी करावी.

हलके व आरामदायी कपडे वापरावे.


३ रा महिना

या महिन्यात ज्ञानेंद्रियांचा विकास होऊ लागतो. महिन्यात बाळाचा आकार अतिशय छोटा असल्यामुळे मातेला त्याची हालचाल जाणवत नाही. हळूहळू सर्व अवयव विकसित होतात. या महिन्यांमध्ये बाळ आपले डोके उचलण्याचा प्रयत्न करते. व संवेदन तंत्र काम करू लागतात. व माता जे ऐकते, बोलते, पाहते, त्याचा बाळ अनुभव घेते.या महिन्यात गर्भातील बाळ मुलगा आहे की मुलगी हे समजते. तसेच या महिन्यांमध्ये आईने घेतलेल्या आहाराचा स्वाद व सुगंध घेण्यामध्ये बाळ शक्तिमान बनते. तसेच या वेळी बाळाचे स्वाद केंद्र विकसित होतात.त्यामुळे या महिन्यांमध्ये आईने आहारावर विशेष लक्ष द्यावे. जास्त तिखट मसालेदार चटपटीत आहार घेऊ नये. त्याऐवजी पौष्टिक व सात्विक आहार घ्यावा. या महिन्यांमध्ये कर्णेद्रियांचा विकास होतो. त्यामुळे मधुर संगीत, प्रार्थना ,भजन, सत्संग ऐकून मातेने स्वस्त होऊन सकारात्मक व आनंदी वातावरणात रहावे. या महिन्यापासूनच मेंदू ची संपूर्ण रचना सुरू होते, त्यामुळे मातेने आपल्या विचारांवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे.जसे सकारात्मक विचार करावा  राग चिंता सोडून देऊन तनाव मुक्त रहावे.

४था महिना

या महिन्यात.बाळाच्या वजन व लांबीच्या वाढीमध्ये गती येते डोक्याचा आकार वाढतो,भुवया व पापण्यांवरती केस येऊ लागतात. चेहरा स्पष्ट बनतो.बाळाची त्वचा चांगली बनते. त्वचेमध्ये स्वेद ग्रंथी तयार होऊ लागते. श्रवण यंत्र पूर्णपणे कार्यरत होते. अशा वेळी ऐकलेले आवाज बाळाच्या अंतर्मनात कायमस्वरूपी राहतात.आई जे अन्नग्रहण करते त्याचा स्वाद बाळाला समजतो. त्यामुळे बाळाला पसंत नसलेले अन्नपदार्थ पदार्थ पुढे जन्मानंतर बाळामध्ये नकारात्मक स्वरूपात ते  कायमस्वरूपी राहतात. या महिन्यात दही भात लोणी व हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश असावा. तसेच मोसंबी संत्री द्राक्षे व सीजन नुसार फळे खावीत.बाळाच्या डोळ्यांचे तेज वाढते.बाळाच्या किडनी चे काम सुरू होते. बाळाचा आकार वाढतो ३ महिन्या पेक्षा थोडी हालचाल जास्त सुरू होते.

५ वा महिना

या महिन्यात बाळाचे स्पशेंद्रीये चांगल्याप्रकारे कार्यरत होतात. आईने पोटाला केलेल्या स्पर्शाच्या संवेदना बाळाला जाणवतात. त्यामुळे बाळ त्यानुसार प्रतिसाद देते व बाळाच्या ही हालचाली आईला चांगल्या प्रकारे समजतात. या महिन्यात बाळाचे एकृत तयार होते व आत मध्ये मल बनायला सुरुवात होते.बाळ कधी कधी शांत तर कधी चंचल असते. बाळाच्या त्वचेमधून सफेद मऊ ओलसर श्राव सुरू होतो तो बाळाच्या त्वचेचे रक्षण करतो. त्याच्या त्वचेवर सुरकुत्या पडतात व त्वचा लाल होते या महिन्यात बाळाची लांबी ३०से.मी.व वजन २००ते४५० ग्राम होते.

आपल्या पोटावर हात ठेवून बाळासोबत संवाद साधा. कारण या महिन्यात बाळ आईच्या भावना समजते व भावनांना प्रतिसाद देते. त्यामुळे आईचे प्रेमळ, इर्षा रहित, आनंदी, कोमल वह मधुर व्यक्तिमत्व असावे.

६ वा महिना

या महीन्यात बालाच्या बुद्धिचा विकास होतो.बाळाच्या डोळ्यांचा पूर्णपणे विकास झालेला असतो. पापण्या उघडू शकतात व बंद होऊ शकतात. बाळ रडू शकते. व लाथ मारू शकते. बाळाच्या हालचाली चा वेग वाढतो. उचकी येऊ शकते. त्वचा सुरकुती युक्त व लाल असते. या महीन्यात बाळ अधिक शक्तिशाली बनते. माते च्या पोटाचा आकार वाढू लागतो. त्यामुळे त्वचा ताणली जाऊन त्वचेवर स्टेचमार्क पडतात व खाज येते काळे डाग पडू लागतात. यावर खास उपाय नाही पण या काळामध्ये ओलसरपणा टिकून राहण्यासाठी एखाद्या मॉइश्चरायझर चा वापर करावा.

या महिन्यात बाळाच्या भौतिक विकासासाठी गणिती खेळ, कोडी सोडविणे, ड्रॉइंग करणे, क्राफ्ट, तसेच विविध कलेमध्ये मातेने मन एकाग्र करावे.

तसेच आहारामध्ये दूध दुग्धजन्य पदार्थ केळे संत्री मोसंब द्राक्षे चिकू इत्यादी सीजन नुसार फळे घ्यावीत.

७ वा महिना

या महिन्यात बाळाचा संपूर्ण विकास होतो. याकाळात गर्भातील बाळ ऐकणे, पाहणे ,स्पर्शज्ञान, स्वाद घेणे या सर्व इंद्रियांचा उपयोग करू लागते. या व्यतिरिक्त त्याचे मज्जा तंत्र विकसित होते. त्याद्वारे गर्भातच बाळ श्वसन कार्य व तापमा मनावर नियंत्रण ठेवू शकते. गर्भवतीच्या पोटावर कान लावल्यास बाळाची धडधड ऐकू येते व हालचाल जाणवते. बाळाची उंची ३२-४२ व वजन ११००-१३५० इतके बाळ अंगठा चोखू लागते. 

या महिन्यात बाळाचे वजन चांगले वाढावे बाळ  शक्तिशाली बनावे यासाठी मातेने दूध तूप व सुका मेवा यांचा आहारात समावेश करावा. कलाकुसरी मध्ये मन एकाग्र करावे, सकारात्मक रहावे, महान पुरुष यांचे आत्मचरित्र वाचावे, व बाळामध्ये उत्तम आणि महान गुणांचे सिंचन करण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करावी

८ वा महिना

या महिन्यात बाळाच्या मास पेशी मजबूत बनू लागतात. व आंतरिक शक्ती वाढते. बाळाचे मजा तंत्र संपूर्ण तयार होते. बाळाच्या फुफ्फुसांची झपाट्याने वाढ होते.बाळाचे डोळे उघडलेले असतात व पापण्या उघडझाप करतात त्यामुळे झोपण्याच्या उठण्याच्या सवयी सोबत बाळ सक्रिय राहते. या महिन्यात बाळाचे वजन२००० ग्राम पर्यंत वाढते व लांबी२३०० सेंटीमीटर पर्यंत होते. या महिन्यांमध्ये बाळाच्या हालचाली चा वेग वाढतो.

या महिन्यात प्रसूती होऊ नये यासाठी मातेने विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी प्रवास करू नका, जास्त वेळ उभे राहून काम करू नका, पाय लटकते राहतील असे जास्त वेळ बैठे काम करू नका. आराम करा.

या महिन्यात बाळाचे वजन जास्त वाढल्यामुळे पाठीचा मागचा भाग व कमरेमध्ये वेदना होऊ शकतात त्यासाठी औषधांचा वापर टाळा व डॉक्टरचा सल्ला घ्या.

गाईच्या दुधाची खीर व तूप खाल्ल्याने बाळाचे शरीर चांगले बनते व प्रसूतीनंतर स्तनपान करणे सोपे जाते.

पचायला जड व अतिथंड पदार्थ खाणे टाळा. पोट साफ न होणे, पोटात गॅस होणे अशा समस्या होऊ नये म्हणून आहाराची विशेष काळजी घ्या.

बटाटा वांगे काकडी गवार कडधान्य असे वात युक्त पदार्थ खाणे टाळा.

नैसर्गिक व सोप्या पद्धतीने प्रसूती होण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करा.

९ वा महिना

या महिन्यात गर्भाची संपूर्ण वाढ झालेली असते.व ते बाहेरच्या दुनियेत येण्याच्या तयारीला लागते. त्यामुळे बाळाचे डोके खाली सरकू लागते.या महिन्यात डोके खाली व पाय वरती अशा स्थितीमध्ये बाळ असते. या महिन्यात बाळ शांत राहते. बाळाचे वजन ३२००-३४०० ग्रॅम व लांबी ५०से मी. होते.

हा झाला बाळाचा एक ते नऊ महिन्या पर्यंत चा शारीरिक विकास व प्रवास... 

प्रसूतीसोपी होण्यासाठी काही वेळेला काही ठिकाणी ,

९ व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नंतर चहा किंवा दुधात एरंडी तेल उकळून मातेला प्यायला दिले जाते.

या महिन्यात बाहेरचे अन्न पूर्णपणे टाळा.

त्याऐवजी हलका आहार घ्या की जेणेकरून पोटामध्ये वात वाढणार नाही.

कुठल्याही प्रकारची तकलीफ व्हायला लागली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

हॉस्पिटल मध्ये जाण्याआधी प्रसुतीसाठी लागणाऱ्या सामानाची तयारी करा.

सोबत एखादी अनुभवी महिला असणे आवश्यक आहे. आपले उत्तम व महान बालक आपल्या मांडीवर आनंदाने खेळावे यासाठी भीती व चिंतामुक्त रहा.

ईश्वराची प्रार्थना करा..!

धन्यवाद!!


मानसिक विकासक

मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आता गर्भसंस्कार आणि सुलभ कष्टरहीत प्राकृत प्रसूती (normal delivery) यांचे महत्त्व जगात वाढत आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतीयांपेक्षा पाश्चात्य लोकं याबाबतीत लवकर आणि अधिक जागरूक होत असल्याचे चित्र आजतरी दिसून येते आहे

डॉ.थॉमस वेर्नी हे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आहेत. १९७२ पासून ते  न्यूरोसिसच्या ( मज्जासंस्थेचा/ मानसिक विकार) रुग्णांवर उपचार करताना, त्या आजाराचे मूळ शोधून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि न्यूरोसिससारख्या अनेक मानसिक आजारांचे मूळ गर्भाशयातील जन्मापूर्वीच्या आयुष्यात व जन्मकाळच्या स्मृतींमध्ये दडलेले असते या निष्कर्षाप्रत ते पोचले आहेत. त्यांच्या एका लेखात ते म्हणतात, "मी हे शिकलो आहे की गर्भाशयातील जीवन काही काव्यमय कल्पनांप्रमाणे फार रमणीय वगैरे असते असे मुळीच नाही".यापैकी बहुतेक रुग्णांचे  अहवाल म्हणजे, गर्भिणीमातेच्या स्नेहयुक्त आणि तिरस्कारयुक्त भावनांना, उत्तरोत्तर अधिकाधिक संवेदनशील होत जाणाऱ्या जीवाचे, मनोव्यापार वर्णन करणारी शब्दचित्रे असतात."

भावनिक विकास नकारात्मकतेचा परिणाम

गर्भावस्था असताना, प्रेग्नंसीबद्दलच्या नकारात्मक भावनांनी ज्यांचे मन कलुषित झालले असते , अशा स्रीयांच्या मुलांचे उपचार करताना त्या मुलांना पडत असणाऱ्या स्वप्नांमध्ये डॉ.थॉमस वेर्नी यांना विलक्षण साधर्म्य आढळले. त्यांच्या पैकी कित्येकांना "आपण एका खोल गुहेत अडकून पडलो आहोत" किंवा "भीतीदायक पशूंचे आकार आपला पाठलाग करत आहेत" अशा प्रकारची व आशयाची स्वप्ने पडत होती. 

काही मुलांनी,  मातेची निराश मनोवृत्ती ,भीती, चिंतेची भावना यांच्या परिणामांना गर्भावस्थेत असताना तोंड दिले होते. ही मुले चिंताग्रस्तता, नैराश्य किंवा औदासिन्य या मनोविकारांसकटच जन्माला आली.

भावनिक विकास-सकारात्मकतेचा परिणाम



ज्या मुलांना गर्भावस्थेतला अनुभव सकारात्मक, व पोषक ( मुख्यतः वैचारिक व भावनिक दृष्टीने) मिळालेला असतो, ती मुले जन्माला येतानाच्या धक्क्यांना सामोरे जाण्यास आणि सुदृढ मानसिकतेसह जीवन सुरू करण्यास, नकारात्मक गर्भावस्था सोसणाऱ्या मुलांपेक्षा अधिक सक्षम असतात. 

डॉ. थॉमस वेर्नी यांचे एक विधान बरेच काही स्पष्ट करणारे आहे. ते म्हणतात, "आपण एक मूल म्हणून कसे असावे आणि पर्यायाने प्रौढ व्यक्ती म्हणून कसे आहोत, हे ,बऱ्याच अंशी, ९ महिन्यांचा गर्भाशयातील जन्मपूर्व कालावधी, जन्म , (प्रसूतीची प्रक्रिया), आणि त्यानंतरचा एक तासाचा कालावधी या गोष्टींवरून निर्धारित होते."

सगळीकडे covid-19 मुळे वातावरण अतिशय निगेटीव्ह झाले आहे सर्व जण घरीच आहेत सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे टीव्ही वरती बातम्या वर्तमानपत्रांमध्ये त्याच बातम्या घरातही ती चर्चा चालू आहे परिणामी गर्भवतीसाठी हे वातावरण अतिशय प्रतिकूल असल्यामुळे तिची चिडचिड होत आहे सो माय डिअर फ्रेंड्स आपण आता नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे म्हणजेच आपला प्रेग्नेंसी काळ आणि हा काळ सकारात्मक व आनंदी असावा हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून आपण उत्साही व आनंदी, एनर्जेटिक राहण्यासाठी"२१ व्या शतकातील गर्भ संस्कार या ग्रुपमध्ये आपले स्वागत आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

"२१ व्या शतकातील गर्भसंस्कार"

तुम्ही जर आपल्या स्वप्नातील सर्वगुणसंपन्न बाळासाठी गर्भसंस्कार हा कोर्स करून घेण्यास उत्सुक असाल तर

 खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून

 माझ्याशी संपर्क साधा...

https://wa.link/92aazl


माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा

धन्यवाद 🙏🙂

बुधवार, १२ मे, २०२१

जन्मपूर्व स्मृती व जन्माचे मानसशास्त्र


तुम्हाला? माहिती आहे का..! की बाळाच्या मेंदूचा८०% विकास हा गर्भात असतानाच होत असतो...!! आणि त्यामुळे बाळ जन्माला येण्यापूर्वी गर्भात असताना ज्या गोष्टी घडतात ज्या ज्या घटना घडतात त्याबद्दल च्या       गर्भाशयात बाळाचा जन्म होण्याआधी व प्रत्यक्ष जन्म       होत असतानाच्या वेळच्या आठवणी किंवा घटना त्याच्या पुढील आयुष्यभर अंतर्मनामध्ये कशा राहतात हे जरतुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यवाचा...

नमस्कार मी अलका शिंदे

गर्भसंस्कार मार्गदर्शक आणि सेल्फ कोच

२१ व्या शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका, मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवती मातांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे व त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचा आहे आणि हा माझा ध्यास आहे...

आधुनिक संशोधन सांगते की बाळ गर्भात असतानाच बाळाच्या मेंदूचा ८० टक्के विकास होतो आणि त्यामुळे जन्म पूर्व घडलेल्या घटना व स्मृती त्याच्या अंतर्मनामध्ये आयुष्यभर राहतात. एवढेच नव्हे तर या घटनांचा माणसाचा स्वभाव, वर्तणूक , बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व तसेच काही मानसिक आजारांशी संबंध असतो असेही अभ्यासाने आढळून आले आहे. सहसा बहिर्मनामध्ये या आठवणी व घटना व्यक्त नसतात परंतु अंतर्मनात त्या रुजलेल्या असतात. जर काही उपायाने त्या अंतर्मनातून वर आणता आल्या तर त्यांच्याशी निगडीत बऱ्याच व्याधींवर इलाज करणे सोपे जाऊ शकते. याची उदाहरण आपण पुढे पाहूच.

तरीदेखील आकडेवारी असे सांगते की दर 300 माणसामागे दोन किंवा तीन लोकांना जन्म पूर्व किंवा जन्म कालीन घटनांची आठवण असते.

संमोहन


हिप्नोथेरपी किंवा मेंदू वर काम करून स्मृती जागृत करण्याचे प्रयोग आज अनेक संशोधक करीत आहेत.डॉ. ग्रॉफ हे रुग्णांना  LSD नावाचे विशिष्ट  रसायनद्रव्य (हे प्रामुख्याने मेंदूवर कार्य करते) देऊन त्यांच्या, गर्भावस्थेत असतानाच्या स्मृती जागृत करत असत.डॉ.ग्रॉफने नोंदवलेले, त्यांच्या एका रूग्णाने केलेले  गर्भाशयात असतानाच्या अनुभवाचे  वर्णन आश्चर्यचकित करणारे आहे. (डॉ ग्राफ यांच्या संशोधन पद्धती विषयी पुढे माहिती येईल). तर त्या रुग्णाला, विशिष्ट डोसमध्ये LSD दिल्यावर, गर्भाच्या देहाकाराची जाणीव झाली. त्याचे डोके प्रौढांपेक्षा, शरीराच्या मानाने मोठे होते. कोणत्या तरी द्रव पदार्थामध्ये तो बुडलेला होता आणि नाभीपासून एका दोरखंडाने (नाळ ) प्लॅसेंटाला जोडलेला होता. वेगवेगळ्या गतीने चालणाऱ्या दोन हृदयांचे  दोन भिन्न आवाज त्याला ऐकू येत होते. आणि वारंवार येणाऱ्या, आतड्यांच्या हालचालींमुळे होणाऱ्या आवाजांची (पेरिस्टॅलिटिक साउंड) त्याला जाणीव झाली. त्याला अनोळखी अशा संकेतांच्या किंवा खाणाखूणांच्या आधारे, त्याने प्रसूतीपूर्वीचा अगदी परिपक्व गर्भ म्हणून स्वत: चे निदान केले.  अचानक त्याला बाहेरून विचित्र आवाज ऐकू आले. त्याला वाटले की ते आवाज उदराच्या भिंती आणि गर्भाच्या द्रवामुळे अस्पष्ट आणि घुमल्यासारखे येत आहेत. हसण्या खिदळण्याचे अपरिचित मानवी आवाज तो ऐकत होता आणि वाद्यांचे कर्कश्श नाद त्याला कर्निव्हलच्या कर्ण्याची आठवण करुन देत होते.  त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी त्याच्या मूळ गावी दरवर्षी भरणाऱ्या वार्षिक फुलांच्या बाजाराची आठवण झाली. 

नमूद केलेली माहिती एकत्र केल्यावर, त्याने असा निष्कर्ष काढला की त्याची आई गरोदरपणाच्या शेवटच्या अवस्थेत बाजारात गेली असेल. 

पुढे त्याच्या आईकडून स्वतंत्रपणे माहिती मिळाली की  आई आणि आजीचा विरोध असूनही कार्निवल उत्सवाच्या ऐन धामधुमीत ती बाजारात गेली होती आणि  त्यामुळे तिची प्रसूती लवकर (वेळेच्या अगोदर) (प्रिमॅच्युअर ) झाली होती.

आधुनिक इतिहासातील विवेकानंद स्मृति



स्वामी विवेकानंद जेव्हा ८/९ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या घरी काही उत्साहाने निमित्य भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता मैथिली चांगलीच रंगलेली होती त्यामध्ये एक सुप्रसिद्ध गायक एक विशिष्ट रागात होते मधेच उभे राहून स्वामीजी म्हणाले की तुम्ही हा राग चुकीचा गात आहात गायकांना त्याबद्दल थोडं आश्चर्य वाटलं त्यांनी स्वामींना हसून विचारलं की बाळा तुला यामध्ये काय चुकीचं वाटतं त्यावर स्वामीजींनी तो राग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गाऊन दाखवला सर्व प्रेक्षक गं मंत्रमुग्ध झाले व स्वतः गायक सुद्धा आश्चर्यचकित होऊन स्वामीजींना म्हणाले की बाळ हे शिक्षण तू कुठे घेतला आहे का खूप विचारणा केल्यावर आढळून आलं आलं की स्वामीजी जेव्हा गर्भात होते तेव्हा त्यांचे आई भरपूर वेळा हा राग ऐकायची आणि हेच स्वामीजींना मिळालेलं गर्भस्थ ज्ञान होतं गर्भस्थ शिक्षण होतं. संशोधनाने हे सिद्ध झालं आहे की गर्भधारणेच्या अगदी चौदाव्या दिवसापासूनच बाळाची स्मृती म्हणजे मेमरी विकसित व्हायला लागते गर्भसंस्कारांचा विचार करताना या गोष्टीचं किती महत्त्व आहे हे वेगळं सांगायची अर्थातच आवश्यकता नाही.

याविषयी पुष्कळ साहित्य आज उपलब्ध आहे त्यापैकी डॉक्टर डेव्हिड चेंबरलीन यांचं "Babies remember birth" हे पुस्तक सर्वत्र वाखाणले गेले असून  अतिशय वाचनीय आहे.) असे डॉक्टर नरेंद्र लेले यांनी म्हटले आहे...

कल्पनेतील हवहवस असलेलं बाळ प्रत्यक्षात आणण्याचा हाच तो कालावधी आहे की ९ महिन्यांमध्ये मिळालेले ज्ञान त्याच्या ९० वर्षापर्यंत त्याला कायम स्वरूपी उपयोगी येते..

आपल्याला आपला बाळ भारतरत्न, ब्रिलियंट, सर्वगुणसंपन्न व यशस्वी लोकांपैकी एक हवा असेल तर त्या लोकां प्रमाणे त्याला बनवण्यासाठी कोण कोणत्या टेक्निक्स वापरायच्या व त्याचे सिक्रेट काय आहे या सर्व गोष्टींचे ज्ञान तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने व मायबोली मराठी मध्ये "२१ शतकातील गर्भसंस्कार" या कोर्समध्ये दिले जाईल.

आपण प्रेग्नेंट असाल व आपल्याला असा बाळ हवा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व "२१ व्या शतकातील गर्भसंस्कार हा फेसबुक ग्रुप जॉईन करा"

२१ शतकातील गर्भसंस्कार

आपण जर मनापासून आपल्या बाळाच्या भवितव्यासाठी गर्भसंस्कार करून घ्यायला इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माझ्याशी संपर्क साधा

गर्भसंस्कार मार्गदर्शक-अलका शिंदे

तुम्हाला गर्भसंस्कारा विषयी माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माझा यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा व व्हिडीओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा..!

https://youtu.be/bE_F2iPKDpI

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा

धन्यवाद 🙂

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...